• Mon. Jul 13th, 2026

    Ramdas Athawale: शरद पवार यांनी ‘एनडीए’त यावे! केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य; सत्तेत समावेशाचे आमंत्रण

    Ramdas Athawale: शरद पवार यांनी ‘एनडीए’त यावे! केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य; सत्तेत समावेशाचे आमंत्रण

    Ramdas Athawale On Sharad Pawar: आपण पवार यांच्याबरोबर होतो, तेव्हा त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला दिला होता. तो त्यांनी मानला असता; तर कदाचित ते देशाचे पंतप्रधान झाले असते, असा दावाही आठवले यांनी या वेळी केला.

    रामदास आठवले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाविष्ट होण्याचे आवाहन यापूर्वीच केले होते. पवार यांनी ते मान्य केले असते; तर ते कदाचित देशाचे राष्ट्रपती झाले असते,’ असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला.

    ‘पवार यांचा पक्ष अजूनही ‘एनडीए’मध्ये समाविष्ट होऊ शकतो. त्यातच समाजाचे आणि देशाचे हित आहे,’ अशा शब्दांत आठवले यांनी पुन्हा शरद पवार यांना सल्ला देऊन ‘एनएडीए’चे आमंत्रण दिले.

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे विलीनीकरण झाले असते; तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाध्यक्ष झाले असते. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता मावळली आहे,’ असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

    Maharashtra TimesMoshi Accident: 83 तासांत मोशीतील रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 8 जणांचा करुण अंत; घटनास्थळी कुटुंबाचा हंबरडा
    एका कार्यक्रमानिमित्ताने आठवले पुण्यात आले असता त्यांनी त्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. या वेळी ‘आरपीआय’चे शहराध्यक्ष संजय सोनवणे, उपमहापौर परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, महिपाल वाघमारे, नगरसेविका हिमाली कांबळे, मोहन जगताप आदी उपस्थित होते.

    ‘‘ऑपरेशन टायगर’ हे भाजप अथवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आणलेले नाही; तर ते ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलित आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे मुख्य नेते असून, त्यांच्यावरील विश्वासामुळेच अन्य पक्षातील नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. ठाकरे यांनी महाविकास आघाडी केली नसती; तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती,’ अशा शब्दांत आठवले यांनी ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

    Sushma Andhare |मोशी दुर्घटना प्रकरणी पालिका आयुक्त, प्रकल्प अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

    ‘शिंदे मुख्यमंत्रिपदी नाहीच’
    केंद्रात फडणवीस यांना मंत्री केल्यास राज्यात शिंदे यांच्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे आमदार बच्चू कडू म्हणाले होते. त्याबाबत विचारता, ‘सन २०२९ पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदी राहतील. भाजप शिंदे यांना यापुढे मुख्यमंत्री होऊ देणार नाही,’ अशी भूमिका आठवले यांनी व्यक्त केली.

    मातृभाषेचा अभिमान बाळगणे अत्यावश्यकच आहे. मात्र, त्या अभिमानातून अन्य भाषांचा द्वेष करणे हा संविधानाचा अपमान आहे. मुंबईमध्ये ६० टक्के मराठी; तर ४० टक्के अन्य भाषिक लोक राहतात. त्यामुळे देशात बोलल्या जाणाऱ्या हिंदी भाषेत भाषण करणे अजिबात गैर नाही. -रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा