• Wed. Jul 1st, 2026
    घरच्या ओढीने निघालेल्या चिमुरड्यावर काळाचा घाला, स्कूलबसवर झाड कोसळून करुण अंत, ऑफिसमध्येच आईवर दुःखाचा डोंगर

    Chembur School Bus Accident : दोन मुले उतरल्यावर स्कूल बस ११ व्या रस्त्यावरील एका विद्यार्थ्याला उतरवण्यासाठी थांबली असताना, त्याच वेळी हे झाड कोसळून दुर्दैवी अपघात झाला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : चेंबूरमधील ११ वी गल्ली दिवसाच्या कुठल्याही वेळी तशी शांतच असते. दुपारी तीन वाजताच्या सुमारास पडणारा मुसळधार पाऊस वगळता ही गल्ली मंगळवारीही तशी शांतच होती. मात्र, या गल्लीतील हेरिटेज हाइट्स आणि रागिणी या दोन इमारतींच्या बाहेर असलेला एक पिंपळाचा वृक्ष कोसळला आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या स्कूल बसवर पडला. महिनाअखेर असल्याने अर्ध्या दिवसाने सुटलेल्या युनिव्हर्सल हायस्कूलच्या १४ मुलांना घेऊन ही बस निघाली होती. त्यापैकी दोन मुले उतरल्यावर ही बस ११ व्या रस्त्यावरील एका विद्यार्थ्याला उतरवण्यासाठी थांबली असताना, त्याच वेळी हे झाड कोसळले.

    विहानच्या आईला अचानक फोन

    या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विहान श्रीवास्तव या ११ वर्षांच्या मुलाच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. विहानची आई जुही श्रीवास्तव ही घटना घडली त्यावेळी ऑफिसमध्येच होत्या. अचानक त्यांना फोन आला आणि त्यांना धक्काच बसला. आम्हीही हातातील सर्व कामे टाकून त्यांच्यासोबत रुग्णालयात धाव घेतली, असे त्यांचे सहकारी बी. बी. कर्णा यांनी सांगितले.

    विहानच्या मृत्यूने शिक्षकवर्गही हळहळला

    विहानच्या शिक्षिका दर्शिका मेहता यांनीही विहान खूप चांगला, हुशार आणि खेळकर मुलगा असल्याचे सांगितले. या मुलांसोबत घडलेला प्रसंग खूपच भयानक आहे. विहान चुणचुणीत मुलगा होता. शाळेत तो आमच्या खेळाच्या टीममध्येही होता. त्याच्यासोबत हे असे काही होईल, याची कल्पनाच करवत नाही, असे त्या म्हणाल्या.
    Maharashtra TimesCrime News : डिनर झालं, पाईपलाईनजवळ गेले अन्… एक्स बॉयफ्रेण्डने 23 वर्षांच्या अंजलीला जिवानिशी संपवलं

    विद्यार्थ्यांना शांत करुन सुटका

    झाड कोसळले तेव्हा महेंद्र पाटील हे स्थानिकही जवळच होते. झाड बसच्या मधोमध कोसळले होते. त्यामुळे बसच्या मागच्या बाजूला बसलेले विद्यार्थी अडकले होते. त्यांना धक्का बसला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना शांत करून मग आम्ही बसच्या खिडक्या फोडून त्यांना बाहेर काढले, असे त्यांनी सांगितले.

    Chembur School Bus Tree fell Accident Vihan Shrivastav Death  Maharashtra Times (1)

    कुकरेजा रेसिडेन्सीवर शोककळा

    या अपघातात मृत्यूमुखी पडलेला विहान घाटला गाव येथील कुकरेजा रेसिडेन्सी या इमारतीत बी विंगमध्ये पाचव्या मजल्यावर राहत होता. स्थानिक आमदार तुकाराम काथे हेदेखील याच इमारतीत राहतात. घटनेबाबत कळताच त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत विहानच्या आई वडिलांना धीर देत इतर प्रक्रिया करण्यास मदत केली. त्यानंतर विहानचे पार्थिव राजावाडी रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आले.

    उद्धव ठाकरेंनी वृद्धाश्रमात जावं, आदित्यंना अवघड दिवस; सचिन अहिरांवरून नितेश राणेंचा हल्लाबोल

    खेळकर विहानच्या निधनाने धक्का

    विहानच्या इमारतीतील सर्वांना ही बातमी कळताच इमारतीवर शोककळा पसरली. दर दिवशी संध्याकाळी शाळेतून आल्यावर विहान मुलांसोबत खाली खेळायला यायचा. तो खट्याळ आणि खेळकर होता. त्याच्या अशा जाण्याने श्रीवास्तव कुटुंबीयांवर झालेला आघात अकल्पित आहे, अशी प्रतिक्रिया इमारतीतील रहिवाशांनी दिली. विहानच्या आईचे आणि वडिलांचे आई वडील दिल्लीत राहतात. या घटनेची माहिती समजताच ते चौघेही विमानाने मुंबईकडे रवाना झाल्याचे स्थानिक आमदार तुकाराम काथे यांनी सांगितले.
    Maharashtra TimesPabe Ghat Accident : जेवणाचं दुपारी कॉल करुन सांगतो, विश्वासचा आईला फोन ठरला अखेरचा, कुटुंबाने शेंडेफळ गमावलं, पहाटे साडेतीनला काळीज चिरणारी बातमी

    मित्र बालंबाल बचावला

    अथर्व बरकडे हा इयत्ता आठवीतील मुलगाही याच बसमध्ये होता. मात्र त्याला कोणतीही इजा न होता तो सुखरूप त्यातून बाहेर पडला. अथर्वचे वडील अजित बरकडे यांनी याबाबत देवाचे आभार मानले, पण घडल्या घटनेचा अथर्वला प्रचंड धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. अथर्व बालंबाल बचावला असला, तरी त्याचा मित्र विहान या अपघातात दगावला आहे. आम्ही अथर्वला याबाबत काही सांगितले नाही. तो स्वत: अद्याप धक्क्यात आहे. हे समजले, तर त्याला आणखी मोठा धक्का बसेल, असे त्यांनी सांगितले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा