Balawant Wankhade On Ravi Rana: प्रसिद्धी आणि जमिनीवरील काम यात फरक असतो, हे जनतेने मतपेटीतून दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले.
अमरावती राजकारण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, अमरावती: देशभर ओळख मिळावी यासाठी मला कोणत्याही प्रकारची नौटंकी करण्याची गरज नाही. मी प्रसिद्धीपेक्षा मतदारसंघातील कामाला प्राधान्य देतो. मला देशभर ओळखायला मी काही हिरोइन नाही, लोकप्रतिनिधी आहे. असा टोला खासदार बळवंत वानखडे यांनी लगावला. दिल्लीत विद्यमान खासदारांना कोणी ओळखत नाही, अशी टीका रवी राणा यांनी केल्यानंतर खासदार वानखडे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा माझा स्वभाव नाही. संपूर्ण महाराष्ट्राने मला ओळखले नाही तरी चालेल, पण मी जनतेच्या कामात समाधानी आहे, अशा शब्दांत वानखडेंनी राणा दाम्पत्याला सुनावले. वानखडे यांनी माजी खासदार नवनीत राणांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हनुमान चालीसा पठन किंवा मातोश्रीबाहेर आंदोलन करून मिळवलेली प्रसिद्धी म्हणजे जनमानसातील लोकप्रियता नव्हे, असा टोला त्यांनी लगावला.
Praful Gudadhe On Vishwas Nagre Patil: विश्वास नांगरे पाटील माझा एन्काऊंटर करतील; नागपूर काँग्रेस शहराध्यक्षांचा गंभीर आरोप काय म्हणाले रवी राणा ? बडनेराचे आमदार रवी राणा यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना विद्यमान खासदार बळवंत वानखडे यांच्यावर निशाणा साधला होता. दिल्लीत अमरावतीच्या खासदारांना आज कोणीही ओळखत नाही. स्वत:ची ओळख सांगण्यासाठी त्यांना मी नवनीत राणांचा पराभव केला, एवढेच म्हणावे लागते. हा जिल्ह्याचा तोटा आहे, असा दावा राणा यांनी केला.
Raj Thackeray On Vishwas Nagare Patil: पोलिसांनी पक्ष, संघटनांपुढे बुद्धी गहाण ठेवू नये! राज ठाकरेंची विश्वास नांगरे पाटील यांच्यावर टीका पुढे बोलताना ते म्हणाले की, जर नवनीत राणा पुन्हा निवडून आल्या असत्या, तर त्यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाले असते. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनंतर जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची मोठी संधी हुकली. केवळ संविधान धोक्यात असल्याच्या खोट्या अपप्रचारामुळेच नवनीत राणांचा पराभव झाल्याचे त्यांनी सांगितले.
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा