• Sun. Jun 28th, 2026
    ताईंचा गैरसमज झाला, मेधा कुलकर्णींच्या आरोपांवर अभिमन्यू पवारांचं उत्तर, जाहीर दिलगिरी मांडतो, पण कार्यक्रम सोडणं वैयक्तिक विषय

    Abhimanyu Pawar on Medha Kulkarni : माझ्या बोलण्यामुळे मेधा कुलकर्णी यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, पण कार्यक्रम सोडून जाण्याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, असे अभिमन्यू पवार यांनी स्पष्ट केले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘सारथी’ संस्थेच्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये पहिल्या रांगेतील आसनव्यवस्थेवरून वाद झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
    खासदार मेधा कुलकर्णी यांनी आमदार अभिमन्यू पवार यांनी जातीय स्वरूपाचे वक्तव्य केल्याचा आरोप करून संताप व्यक्त केला आणि कार्यक्रमस्थळ सोडले. मात्र, पवार यांनी हा आरोप फेटाळून लावून गैरसमज झाल्याचे सांगून दिलगिरी व्यक्त केली आहे.

    मेधा कुलकर्णी यांचे गंभीर आरोप

    ‘सारथी’ संस्थेतर्फे ‘यूपीएससी’ आणि ‘एमपीएससी’ परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी पुण्यात आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या वेळी पहिल्या रांगेतील रिकाम्या खुर्चीवर बसण्यासाठी जात असताना आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्याला अडवून, ‘हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, तुम्ही पुढे बसलात तर वाद होईल,’ असे सांगितल्याचा आरोप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला. ‘चुकीच्या बातम्या होऊ नयेत, यासाठी हा खुलासा करीत आहे. जातीचे राजकारण करू नका,’ असे आवाहनही त्यांनी केले; तसेच पवार हे माझे भाऊच आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
    Maharashtra TimesSiya Goyal : चेतन रडायला लागला, म्हणाला तुला जमणार नाही, मीच केतनला ढकलतो, सियाचा दावा; एकमेकांवर दोषारोप सुरुच

    ‘परमेश्वराला स्मरुन पवारांनी सत्य सांगावे’

    कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना पवारांवर गंभीर आरोप केले. हा कार्यक्रम मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि ‘सारथी’ संस्थेचा होता. मात्र, माझ्या जातीकडे चुकीच्या नजरेने पाहत कार्यक्रमाला जातीय रंग देण्यात आला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पुढे बसावे, अशी माझी स्वतःचीच इच्छा होती. मात्र, अधिकारी पुढे बसण्यास सांगत असतानाही अभिमन्यू पवार यांनी ‘हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे, तुम्ही पुढे बसू नका; वाद होईल,’ असे सांगितले. हा जागेचा नव्हे, तर जातीचा विषय आहे,’ असा दावा त्यांनी केला. परमेश्वराची शपथ घेऊन सांगते, की पवार यांनी हे शब्द उच्चारले होते. त्यांनीही परमेश्वराला स्मरून आपण असे बोललो नव्हतो, असे सांगावे, असे आव्हान त्यांनी दिले.

    Raj Thackeray News | ‘पांढरे पट्टे काय मारताय’, भडकलो तर पाहा! शिवरायांच्या जिरेटोपाचा वाद संपला

    ‘स्वतःला ‘सुपर सीएम’ समजतात का?’

    याशिवाय, ‘मी काही मराठा समाजातील नागरिकांची कामे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते. अभिमन्यू पवार अजूनही स्वतःला मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव समजतात का, स्वतःला ‘सुपर सीएम’ समजतात का,’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘त्यांच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ब्राह्मण समाजाचा मेळावा घेतला होता. प्रकृती ठीक नसतानाही मी त्या मेळाव्याला जाऊन त्यांच्या समर्थनार्थ मतदानाचे आवाहन केले होते,’ अशी आठवणही त्यांनी करून दिली.

    दरम्यान, या प्रकाराची आज दिवसभर चर्चा होती. सोशल मीडियावरही याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले.
    Maharashtra TimesSiya Goyal Mom Dad : आम्ही म्हटलेलं सिया 19 वर्षांचीच, इतक्यात लग्न नको, पण ‘ते’ मागे लागले; बाबांचा वेगळाच दावा; तिची 10 वेळा पसंती विचारलेली!

    अभिमन्यू पवारांची जाहीर दिलगिरी

    या वादानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी सर्व आरोप फेटाळले. ‘मेधाताईंचा गैरसमज झाला आहे. नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असल्याने त्यांनी पुढे बसावे, आपण दोघे मागे बसू, एवढेच मी सांगितले होते. त्यात जातीचा कोणताही संदर्भ नव्हता,’ असे पवार म्हणाले. ‘मेधाताई माझ्या ज्येष्ठ नेत्या आहेत. माझ्या बोलण्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. कार्यक्रम सोडून जाण्याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा