मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याची एक वादग्रस्त घटना घडली होती. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतलेली. यानंतर आता जैन समाजाच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी मुंबईतल्या रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या मारण्यावरून झालेल्या वादाचा मुद्दाही उपस्थित केला.