Marathi Live News: मान्सून मंगळवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याचा जलद प्रवास झाला आहे. बुधवारी संपूर्ण राज्यात मान्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले. प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई, ठाणे जिल्ह्यांसाठी, तसेच रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी गुरुवारसाठी यलो ॲलर्ट जारी केला आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये गुरुवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकेल. दरम्यान, भोर तालुक्यातील नसरापूर प्रकरणात साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या, युक्तिवादही पूर्ण झाला असून, या प्रकरणी आज (२५ जून) आरोपीला शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर
