• Sun. Jun 14th, 2026

    MLC Election : नाशिकच्या राजकारणात आता ‘हॉटेल पॉलिटिक्स,’ शिवसेनेचे नगरसेवक सहलीला निघाले

    MLC Election : नाशिकच्या राजकारणात आता ‘हॉटेल पॉलिटिक्स,’ शिवसेनेचे नगरसेवक सहलीला निघाले

    नाशिकच्या राजकारणात आता हॉटेल पॉलिटिक्स बघायला मिळत आहे. शिवसेनेचे नगरसेवक विधान परिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सहलीला निघाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कसं करायचं? याचं प्रशिक्षण या नगरसेवकांना दिलं जाणार असल्याची माहिती आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : नाशिकच्या राजकारणात आता हॉटेल पॉलिटिक्स बघायला मिळत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या 18 जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व नगरसेवक सहलीला गेले आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांची बस नाशिकहून सहलीला निघाली आहे. ही सहल ठाण्याला पोहोचण्याची शक्यता आहे. या नगरसेवकांसाठी ठाण्यात रिसॉर्ट बुक करण्यात आल्याची चर्चा आहे. या सहलीबाबत शिवसेनेचे नेते तथा उपमहापौर विलास शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नगरसेवकांसाठी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. तिथे मतदान कसं करायचं याबाबत प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

    विलास शिंदे काय म्हणाले?

    “नाशिकसह राज्यभरात विधान परिषदेची 17 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. 17 पैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नाशिकमधला सातवा उमेदवारही बिनविरोध निवडून येऊ शकला असता. पण काही कारणास्तव आमच्या मित्रपक्षाच्या उमेदवाराची वेळेवर माघार होऊ शकली नाही. सबंधित आमच्याच सहकारी पक्षाच्या उमेदवाराने जाहीर पाठिंबा दिलेला आहे”, अशी प्रतिक्रिया विलास शिंदे यांनी दिली.

    “असं असताना निवडणूक प्रक्रिया होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया होत असताना 619 मतदार आहेत. यापैकी अनेक मतदार हे नव्याने नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीची एक वेगळी प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेचं शिबिर मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे”, अशी माहिती विलास शिंदे यांनी दिली.

    “नाशिक जिल्ह्यात अनेक नवे नगरसेवक आहेत, त्यांचा एकत्रित कार्यक्रम असावा, काम करण्यासाठी त्यांना एकमेकांची मदत व्हावी, परस्परात ओळख परिचय व्हावा, निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या भागात कसे काम करावे याचे मार्गदर्शन वरिष्ठ नेते करणार आहेत त्यामुळे या शिबिरला जाण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत”, असं विलाश शिंदे म्हणाले.

    “आमच्या कुणाच्याही मनात धाकधूक नाही. महायुतीचं संख्याबळ हे 550 पेक्षा पुढे आहे. असं असताना धाकधूक ठेवायचं काही कारण नाही. ही जागा शिवसेनेला सुटली आहे. त्यामुळे इतर मित्रपक्षांचे नगरसेवक शिवसेनेला मतदान करणार आहेत. महाराष्ट्रातील 17 पैकी 17 जागा निवडून येतील”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या 18 जूनला मतदान होणार आहे. नाशिक विधान परिषदेच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी दावा केला होता. पण वाटाघाटी करताना ही जागा भाजपला सुटली. तसेच जळगावची जागादेखील भाजपला सुटली. जळगाव आणि नाशिक दोन्ही ठिकाणी बंडखोरी होताना बघायला मिळत होतं. पण दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांना बंड शमवण्यात यश आलं. यानंतर आता 22 जूनला या निवडणुकीला निकाल समोर येईल. त्यावेळी कोण जिंकतं ते पाहणं महत्त्वाचं असेल.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा