राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईत पार पडला. यावेळी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पक्षातील नेत्यांना इशारा देखील दिला. अनावश्यक हस्तक्षेप केल्यास कठोर निर्णय घेतला जाईल, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. त्यांच्या या भूमिकेचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी कौतुक केलं आहे. सुनेत्रा पवारांनी सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांना झापलं असल्याचा दावा दामनियांनी केला. तसेच आमदार धनंजय मुंडे यांचं वर्चस्वही संपलं असल्याचं वक्तव्य दमानिया यांनी केलं.