महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा काही भरोसा नाही. कारण सोलापुरातील तशाच घडामोडी घडताना दिसत आहेत. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चार आमदार आहेत. त्यापैकी तीन आमदार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला गेल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.