• Wed. Jun 10th, 2026

    मेट्रो स्थानकांखाली रिक्षा, कॅबचालकांची मनमानी, पुण्यात वाहतूककोंडी आणि प्रवाशांची लूट कायम; प्रशासन सुस्त

    मेट्रो स्थानकांखाली रिक्षा, कॅबचालकांची मनमानी, पुण्यात वाहतूककोंडी आणि प्रवाशांची लूट कायम; प्रशासन सुस्त

    श्रीकृष्ण कोल्हे, पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी आणि प्रवाशांचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी मेट्रोसेवा सुरू करण्यात आली. मात्र, मेट्रोचा हा सुखकर प्रवास स्थानकातून बाहेर पडताच क्लेशदायक ठरत आहे. शहरातील प्रमुख मेट्रोस्थानकांच्या खाली रिक्षा आणि कॅबचालकांकडून होणारे बेकायदेशीर दुहेरी पार्किंग (डबल पार्किंग) आणि प्रवाशांची सुरू असलेली आर्थिक लूट यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, या बेशिस्तीकडे वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) प्रशासन सोयीस्करपणे डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे.

    सध्या शहरात स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि रामवाडी ते वनाज या दोन मार्गांवर मेट्रो धावत आहे. मात्र, या मार्गांवरील अनेक मेट्रो स्थानकांच्या खाली रिक्षा व कॅबचालकांनी उच्छाद मांडला आहे. पुणे स्टेशन, रुबी हॉल क्लिनिक आणि आरटीओ या मेट्रो स्थानकांच्या खाली दिवस-रात्र कॅब आणि रिक्षांची मोठी गर्दी असते. येथे कोणतीही शिस्त पाळली जात नसून, सर्रासपणे दुहेरी पार्किंग केले जाते. याचा थेट फटका पुणे रेल्वे स्थानक गाठणाऱ्या प्रवाशांना आणि सामान्य वाहनधारकांना बसत असून, परिसरात कायम वाहतूक कोंडी निर्माण होत आहे; तसेच स्थानकांखाली ‘पीएमपी’ बस उभ्या करण्यासही अडचण येत असून, बस पुढे थांबवाव्या लागत आहेत.

    Mumbai Metro: मान्सूनमध्ये सुरु राहणार मुंबईतील चारही मेट्रो सेवा, पाच गाड्या राखीव ठेवणार; बिघाड टाळण्यासाठी उपाययोजना

    प्रवाशांना पायपीट

    रामवाडी मेट्रो स्थानकाबाहेर वाहतूक पोलिसांनी अत्यंत अजब आणि प्रवाशांना त्रासदायक ठरणारा निर्णय घेतला आहे. पूर्वी या स्थानकाच्या बाजूलाच ‘पीएमपी’चा थांबा होता. मात्र, यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण पुढे करून पोलिसांनी हा थांबा २०० ते ३०० मीटर पुढे हलवला आहे. दुसरीकडे त्याच मेट्रो स्थानकाच्या अगदी खाली बेकायदा उभ्या राहणाऱ्या रिक्षा, दुहेरी पार्किंग आणि रिक्षांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. परिणामी, मेट्रोने उतरणाऱ्या प्रवाशांना, विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना बस पकडण्यासाठी नाहक पायपीट करावी लागत आहे.

    शेअर रिक्षा कागदावरच

    मेट्रो सुरू झाल्यावर आरटीओ प्रशासनाने प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी ‘शेअर रिक्षा’मार्ग आणि त्याचे भाडेदर निश्चित केले होते. काही स्थानकांखाली अतिशय लहान अक्षरांत याचे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात ही योजना पूर्णपणे कोलमडली असून, एकही रिक्षाचालक ठरवून दिलेल्या दरांमध्ये धावत नाही. मीटरप्रमाणे येण्यास सरळ नकार देऊन प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळले जात आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकाखाली प्रवाशांची एक प्रकारे लूटच सुरू आहे.

    “मी कामाच्या निमित्ताने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात नेहमी मेट्रोने प्रवास करतो; पण स्थानकाबाहेर आल्यावर एकही रिक्षावाला मीटरने किंवा ठरवलेल्या शेअर दराने जाण्यास तयार होत नाही. ऑनलाइन कॅब बुक केल्याशिवाय पर्याय उरत नाही. प्रशासनाने आणि मेट्रोने या त्रासातून प्रवाशांची सुटका करावी,” सतीश साठे, मेट्रो प्रवासी.

    Maharashtra TimesPune News: पुण्यातील प्रकल्पांना मिळणार ‘सुपरस्पीड’! भुयारी बोगदे, बाह्य आणि अंतर्गत रिंग रोडसाठी ‘एसपीव्ही’ स्थापन करणार

    “मेट्रो स्थानकाच्या खाली अनधिकृतपणे पार्किंग होणार नाही, यासाठी पुणे रेल्वेस्थानक मेट्रो स्टेशन येथून सुरुवात केली आहे. या ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी थांबून कारवाई करीत आहेत; तसेच इतर ठिकाणी नो-पार्किंगमध्ये उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल. जादा पैसे मागणाऱ्या रिक्षाचालकांची ‘पीटीपी अॅप’वरून तक्रार केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल,” डॉ. संदीप भाजीभाकरे, उपायुक्त, वाहतूक शाखा

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed