Bandra Demolition: वांद्रे पूर्वेकडील अतिक्रमण हटवल्यानंतर परिसरात प्रवाशांसाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. भविष्याच टर्मनिसची क्षमता वाढणार असून वाढत्या प्रवासी संख्येनुसार नियोजन केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: वांद्रे पूर्व येथे गरीब नगरमध्ये अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईमध्ये 400 झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. चार दिवसांच्या या कारवाईनंतर परिसरात रिक्षाचालकांनी कब्जा केला होता. त्यामुळे परिसराला आता कुंपण लावण्यात आलं आहे. या मोकळ्या जागेत वांद्रे रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी ही जागा विकसित होणार आहे.
रेल्वे स्थानकाबाहेर विकास
वांद्रे पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर ज्याप्रमाणे नागरिकांसाठी जागा तयार करण्यात आली आहे तशीच जागा पूर्वेकडेही बांधण्यात येईल अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुंबई विभागाचे व्यवस्थापर पंकज सिंघ यांनी दिली असं ‘मिड डे’ च्या वृत्तात म्हटलं आहे. आता रेल्वे स्थानकाबाहेर येताच नागरिक थेट रस्त्यावरील वाहतूक कोंडीत पोहोचणार नाहीत. त्यापूर्वी त्यांना सर्क्युलेटिंग क्षेत्रातून आरामात रेल्वे स्थानकाबाहेर पडता येईल. याशिवाय यापैकी काही भाग वांद्रे टर्मिनसच्या विकासासाठीही वापरला जाणार आहे. हे टर्मिनस मुंबई सेंट्रल टर्मिनसप्रमाणेच असेल अशी माहिती त्यांनी ‘मिड डे’शी बोलताना दिली.
Mrinaltai Gore Flyover: अर्ध्या तासाचा प्रवास १० मिनिटांत होणार, सात वर्षांनंतर गोरेगावमधील पुलाचा विस्तार पूर्ण; मार्गावर वाहतूक सुरू
या जागेवरील अतिक्रमण हटवून वांद्रे टर्मिनसवर इंटीग्रेटेड स्टेशन कॉम्प्लेक्स तयार करण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे स्थानकावर नवे फलाटं, पायाभूत सुविधा आणि प्रवासी सामावून घेण्याची क्षमता वाढणार आहे. सध्या वांद्रे टर्मिनसवर 22 मेल/एक्सप्रेस ट्रेनची वाहतूक हाताळली जाते. याची क्षमता येत्या काही वर्षांत 50 टक्क्यांनी वाढणार आहे. मेल/एक्सप्रेसची संख्या 22 वरून 50 होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेचा मोठा प्रमाणात विस्तार होणार आहे.
कसा होणार फायदा?
याशिवाय वांद्रे रेल्वे स्थानकापासून टर्मिनसपर्यंत सहजपणे पोहोचण्यासाठी मार्ग तयार करणार आहेत. लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या ट्रेनने प्रवास करणं सोपं आहे. आरटीओ आणि प्रशासनासह मिळून रिक्षा आणि टॅक्सीसाठी स्वतंत्र लेन तयार करण्याचीही योजना आहे. यामुळे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी आणि गर्दी होणार नाही.
Mumbra Local Accident: स्वयंचलित दरवाजांची लोकल, १५ डबा विस्तार, मुंब्रा दुर्घटनेनंतर मोठ्या घोषणा; एका वर्षानंतर परिस्थिती जैसे-थे
महामुंबईतील 5 मुख्य टर्मिनसपैकी वांद्रे टर्मिनस एक आहे. पश्चिम भारत आणि उत्तर भारतात जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेन येथून रवाना होतात. मुंबई सेंट्रेल स्थानकावरील वाढत्या गर्दीमुळे 1992मध्ये वांद्रे टर्मिनस सुरू करण्यात आलं होतं. यो दोन टर्मिनलशिवाय सध्या मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर टर्मिनस आहेत. वांद्रे टर्मिनसमुळे वांद्रे कुर्ला संकुल आणि मुंबई विमानतळावर पोहोचणं सोपं झालं.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा