मराठा समाजासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाला मिळणाऱ्या विविध योजनांच्या धर्तीवर मराठा समाजासाठी तब्बल आठ कल्याणकारी योजना सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता, त्यानंतर आता शैक्षणिक सवलतींसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थी, युवक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारला हा निर्णय घेणं भाग पडलं…या मोठ्या आणि मराठा समाजासाठीच्या महत्त्वाच्या निर्णयानंतर जालन्यातून जरांगेंची पहिली मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे..त्यांनी सरकारचं तोंडभरून कौतूक केलंय…पाहूया या व्हिडीओमध्ये जरांगे नेमकं काय म्हणालेत