राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.गुरूवारी निवडणूक अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतले.त्यामुळेमविआत वादाची ठिणगी पडल्याच सांगितलं जातंय.पुणे विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता नाराजीनाट्य सुरू झालं आहे. पुणे विधान परिषदेमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माघार घेतल्यानंतर मित्रपक्ष काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट नाराज झाला आहे. पुण्यात मविआतून बाहेर पडण्याचा वरिष्ठांकडे प्रस्ताव दिल्याची माहिती काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहा…