उदय सामंत यांनी गिते बंधू आणि महाजन यांच्या संबंधाचा वारंवार उल्लेख केल्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आहे. वेळ मिळाला नसल्याने सामंत यांची भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण महाजन यांनी दिले आहे. तर, राजकारणात समज-गैरसमज होत असतात. ते वेळेवर दूर केले तर त्याचे परिणाम दूरगामी होत नाहीत, असे वक्तव्य सामंत यांनी केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
Nashik Gokul Gite : नाशिकमध्ये भाजपची डोकेदुखी वाढली, शेवटच्या दिवशीही बंडखोर उमेदवाराची माघार नाही, कारण काय? कोण आहेत गोकुळ गीते?
नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोरच भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष गोकुळ गितेंनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांनी दराडेंना पाठिंबा द्यावा, यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून मनधरणी सुरू असून, गोकुळ गिते शुक्रवारी माघार घेवून दरांडेना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यासाठी सामंत गुरुवारी रात्रीपासूनच नाशिकमध्ये तळ ठोकून होते. तर, गिरीश महाजन देखील गुरुवारी रात्री नाशिकमध्ये दाखल झाले होते. दोन्ही नेते एकत्र येऊन गिते बंधूंची समजूत घालतील, अशी अपेक्षा होती. परंतु, सामंत आणि महाजन यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून सूत्रे हलवत गोकुळे गिते, प्रसाद हिरे यांच्याशी संपर्क साधून माघारीसाठी प्रयत्न केले.
जळगावमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेकडून भाजप उमेदवारासमोर बंडखोरी झाली असून, नाशिकमध्येही शिवसेनेच्या उमेदवारासमोर भाजपच्या निकटवर्तीयांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला असून, त्यातून दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी भेटीगाठी टाळल्याचे बोलले जात आहे.
Kirit Somaiya: विशेष लेखापरीक्षण करा! किरीट सोमय्यांची मागणी; हजारो जन्मदाखल्यांत फेरफार झाल्याचा आरोप
गोकुळ गिते विषय लवकर संपेल : महाजन
नाशिकमधील उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीकडून वेगाने प्रयत्न सुरू आहेत. गोकुळ गिते यांच्याशी बोलणे झाले असून, ते सध्या नाशिकबाहेर आहेत. ते परत आले की चर्चा होऊन हा प्रश्न मार्गी लागेल आणि या विषयावर लवकरच पडदा पडेल. आज-उद्यामध्ये हा विषय पूर्णपणे संपून जाईल, असे मंत्री महाजन यांनी सांगितले. ‘बाप काढण्याच्या’ वादग्रस्त मुद्द्यावर मात्र, ‘गोकुळ गितेंना भेटल्यावरच याबाबत विचारणा केली जाईल,’ असेही महाजन म्हणाले.
