Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून ८० लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्टीकरण दिले.
योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या १४ हजार पुरुषांना अजिबात सोडले जाणार नाही, त्यांच्याकडून विनाविलंब पैशांची पूर्ण वसुली केली जाईल’, असा इशारा त्यांनी दिला.
BMC Mayor Ritu Tawade : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, मुंबईच्या महापौरांना उत्तराखंडमध्ये बहुमान
‘लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा महिलांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कागदपत्रे गोळा करण्यास वेळ मिळावा म्हणून सरकारने ‘सेल्फ सर्टिफिकेशन’च्या (स्वयंघोषणा पत्र) आधारावर अर्ज करण्याची मुभा दिली होती.
पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने आयकर विभाग, रेशन कार्ड, परिवहन विभाग आणि सरकारी कर्मचारी वेतन पोर्टलचा डेटा एकत्र करून त्याची सखोल तपासणी केली. यात, तब्बल ५ लाख महिला या सरकारी नोकरीत कार्यरत असतानाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय महिलांसाठी असलेल्या या योजनेत तब्बल १४ हजार पुरुषांनी डमी स्वरूपात घुसखोरी करून लाभ लाटल्याचे समोर आले आहे,’ असे ते म्हणाले.
Maharashtra Cabinet Decisions : फडणवीस सरकारचा बळीराजाला दिलासा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीला मंजुरी
‘पुन्हा खिडकी उघडण्याची तयारी’
गेल्या ९ महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा आणि आवाहन करूनही लाभार्थ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. हे निकष पूर्ण करत नसल्यामुळेच त्यांनी जाणीवपूर्वक केवायसी टाळली असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा अपात्र ठरलेल्या आणि केवायसी न केलेल्या लोकांचे पैसे आता कायमचे रोखले जातील. मात्र, ज्या पात्र महिला तांत्रिक अडचणींमुळे राहून गेल्या आहेत, त्यांच्यासाठी सरकार केवायसीची खिडकी अजूनही उघडी ठेवण्यास तयार आहे, असे सांगत पात्र महिलांनी काळजी करू नये’, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. ‘तांत्रिक कारणांमुळे किंवा निकषांमुळे अपात्र ठरलेल्या महिलांकडून आतापर्यंत बँकेत जमा झालेल्या पैशांची कोणतीही वसुली सरकार करणार नाही’, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
