शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. येत्या ८ ते १० दिवसांत कर्जमाफी केली जाईल, असं कृषीमंत्री भरणे यांनी म्हटलंय. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीच्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.