मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठं यश मिळालंय. मराठा आरक्षणाबाबतच्या विविध मागण्यांबाबत सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. यानंतर जरांगेंनीही आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र शब्दांत राज्य सरकार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर सडकून टीका केली आहे. सरकार लाचार झालं, तसंच प्रसाद लाड पाप धुऊन काढण्यासाठी जरांगेंकडे आले होते अशा धारदार शब्दांत हाकेंनी संताप व्यक्त केला.