राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवायला अखेर यश आले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी यात महत्वाची भूमिका बजावली आहे. उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापूर्वी मध्यरात्री विखे पाटील व प्रसाद लाड यांनी जरांगेंची भेट घेतली. तासभर चर्चा केल्यानंतर मराठा बांधवांशी संवाद साधत जरांगे यांनी उपोषणाला स्थगिती दिली.