SantacruZ-Chembur Link Road: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडणाऱ्या लिंक रोडचं काम आता पूर्ण होणार आहे. 2014मध्ये सुरू झालेल्या या मार्गाचा अनेक वर्षांपासून विस्तार सुरू होता. आता अंतिम टप्पा पूर्ण झाला की मुंबईत 10.88 किमी लांब सिग्नल-मुक्त प्रवास शक्य होईल.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: तब्बल 12 वर्षांनंतर सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड चा दुसरा टप्पा पूर्ण होत आहे. MMRDAचे आयुक्त संजय मुखर्जींनी काही अधिकाऱ्यांसह या मार्गाची पाहणी केली. तेव्हा हा टप्पा 98 टक्के तयार झाली असल्याची त्यांनी माहिती दिली. त्यामुळे सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड पूर्ण क्षमतेने अखेर सुरू होणार आहे.
15 मिनिटांत प्रवास शक्य झाला
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडण्यासाठी हा लिंक रोड 2014मध्ये बांधण्यात आला. या मार्गावल भारतातील सर्वात पहिल्या डबल डेकर उड्डाणपुलाचा समावेश होता. खालच्या स्तरावर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गाच्या रुळांवरील वाहतूक आणि त्यावरती मुख्य रस्त्यावरील वाहतूक असे दोन टप्पे होते. कुर्ला आणि शीवसारख्या वाहतूककोंडीच्या मार्गांना एक पर्याय उपलब्ध झाला होता. यामुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांवरून 15 ते 20 मिनिटांवर पोहोचला होता.
Pune News: पुण्यात ‘डबल डेकर ट्विन टनल’! येरवडा ते कात्रजदरम्यान उभारणी; लवकरच आराखडा तयार करणार
यानंतर लिंक रोड विस्तार करण्यात आला. 2023मध्ये कुर्ल्यापासून बीकेसीपर्यंत एक उन्नत मार्ग तयार करण्यात आला. यामुऴे पूर्वेकडील वाहनांना वांद्रे कुर्ला संकुलापर्यंत पोहोचणं शक्य झालं. त्यानंतर, ऑगस्ट 2025मध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावरून 90 अंशाचा केबल-स्टेड पूल उभारला. यामुळे वाकोला जंक्शनच्या कोंडीशिवाय पूर्व ते पश्चिम द्रुतगती महामार्गावर पोहोचणं शक्य झालं. या दोन्ही दिशेकडील मार्गांमुळे सिग्नल फ्री प्रवास शक्य झाला आणि कलिना, वाकोल्याला बायपास करणं शक्य झालं.
दुसरा आणि अंतिम टप्पा
आता लिंक रोडवरील दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू पूर्ण होत आलं आहे. हा फेज अंतिम असून यानंतर सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. यानंतर या 10.88 किमी लांब मार्गामुळे मुंबईमधून कोंडीमुक्त प्रवास होणार आहे. प्रवासाचा वेळ 35 मिनिटांनी कमी होईल. पूर्ण मार्ग सुरू होताच, पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्ग, वांद्रे-कुर्ला संकुल, सांताक्रूझ, चेंबूर, कलिना आणि कुर्ल्यामधील अंतर कमी होणार आहे.
Dombivali Railway Station: डोंबिवलीकरांचा प्रवास सुखकर होणार! स्थानक परिसराच्या विकासासाठी हालचाली; गर्दी, कोंडीतून कायमची सुटका
अंतिम टप्प्यात बीकेसी ते वकोला मार्ग बांधला आहे. 1.4 किलोमीटरच्या मार्गावर 500 मीटर लांब चार पदरी कॅरेजवे आणि दोन 900 मीटर लांब कनेक्टींग मार्गांचा समावेश आहे. यामुळे मुंबईत जवळपास 11 किलोमीटर सिग्नल-फ्री प्रवास शक्य होणार आहे. आता प्रवाशांना वांद्रे कुर्ला संकुल आणि एअरपोर्टच्या दिशेने प्रवास करताना वाहतूक कोंडी असलेल्या बॉटलनेकसाठी पर्याय उपलब्ध झाला आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा