Pune News : राज्यात गेल्या एक जूनपासून १०५ तालुक्यांमध्ये १४ दिवसांत द्रुतगती; तर २८ दिवसांत नियमित मोजणी करण्यात येणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने मोहीम राबविली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण राज्यात १४ दिवसांत द्रुतगती मोजणी करणे शक्य होणार आहे.
१२०० रोव्हर ही अत्याधुनिक मशिन
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मोजण्यांची प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. त्याच्या तक्रारींची दखल घेऊन तत्कालीन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी युद्धपातळीवर विविध प्रयत्न सुरू केले होते. मोजणी प्रकरणे निकाली काढण्यासाठी १२०० रोव्हर ही अत्याधुनिक मशिन खरेदी करण्यात आली. त्यापाठोपाठ भूकरमापकांची संख्या अपुरी असल्याने खासगी एजन्सीमार्फत भूकरमापकांची नियुक्ती करण्यात येत आहे.
Monsoon Prediction: जून महिन्यात ‘एल निनो’ सक्रिय होणार, सरासरीच्या 90 टक्के पाऊस; ‘आयएमडी’च्या ताज्या अंदाजामुळे शेतकरी अडचणीत
आजमितीला राज्यात ३४०० इतके भूकरमापक आहेत. गेल्या काही वर्षांपासून राज्यात लाखभर मोजण्या प्रलंबित होत्या. त्यांची संख्या कमी झाली आहे. मोजण्यांचा पूर्वीचा कालावधी हा ९० दिवसांवर आला असून, हा कालावधी एका महिन्यावर आणण्याचे भूमी अभिलेख विभागाचे प्रयत्न आहेत. खासगी भूमापकांची आता प्रत्येक जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. पूर्वी दृतगती मोजणी ही ३० दिवसांत; तर नियमित मोजणी ९० दिवसांत होत होती. १०५ तालुक्यांमध्ये या मोहिमेला सुरुवात होणार आहे.
१४ दिवसांत मोजणी करण्यात येणार
‘महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार, मोजणीचा कालावधी आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. रोव्हर्सची उपलब्धता, खासगी भूमापकांच्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर तीन टप्प्यांत राज्यातील विविध विभागांतील जिल्ह्यांमध्ये कमी कालावधीत मोजणी प्रकरणे निकाली काढण्याचे नियोजन सुरू केले आहे. राज्यात १९ जिल्ह्यांतील १०५ तालुक्यांमध्ये १४ दिवसांत मोजणी करण्यात येणार आहे,’ अशी माहिती जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख विभाग, शैलेश नवाल यांनी ‘मटा’ला दिली.
Pimpri Chinchwad News : पुणे विषारी दारु प्रकरण; CM देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर, अल्कोहोलमध्ये मिथेनॉलसारखा पदार्थ; मोठी माहिती दिली
१०५ तालुके कोणते?
सध्या कमी प्रमाणात मोजणीची प्रकरणे दाखल होत आहेत, असे काही जिल्हे राज्यात आढळले आहेत. त्याचा अभ्यास करून भूमी अभिलेख विभागाने नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोकण या विभागांतील तालुक्यांची निवड केली आहे. कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड; तसेच नाशिक विभागात नाशिक, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील तालुक्यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड, परभणी, जालना, लातूर; तसेच अमरावती विभागांमध्ये अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि नागपूर विभागातील नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा या जिल्ह्यांतील तालुक्यांचा समावेश आहे.
