गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा असा दररोज जलवाहतूकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. कारण ही जलवाहतूक पावसाच्या निमित्ताने बंद करण्यात आली आहे. अर्थात हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तवच घेण्यात आला आहे. पण यानंतर आता एसटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी काळजी घेतली जात आहे. प्रवाशांची संख्या वाढण्याचा अंदाज पाहता अतिरिक्त बसेस सोडण्याची तयारी केली जात असल्याची माहिती आहे.