• Sat. Jun 6th, 2026

    केरळप्रवेशाची अजून प्रतीक्षाच, अंदमानात दाखल होऊनही मान्सूनचा पुढचा प्रवास रखडला; मुंबईकरांची होरपळ

    केरळप्रवेशाची अजून प्रतीक्षाच, अंदमानात दाखल होऊनही मान्सूनचा पुढचा प्रवास रखडला; मुंबईकरांची होरपळ

    Monsoon Arrival Date: मान्सून यंदा वेळेपूर्वी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला असताना अजूनही नागरिक प्रतीक्षेत आहेत. महामुंबईत तापमानाचा पारा चढाच असून मुंबईकरांना लवकर दिलासा मिळेल असं वाटत नाही.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: नैर्ऋत्य मौसमी वाऱ्यांनी बुधवारी अरबी समुद्रात तसेच अंदमानच्या समुद्रात आणखी प्रगती केली असली, तरी भारतीय हवामान विभागाने केरळमधील मान्सूनच्या प्रवेशाबाबत भाष्य केलेले नाही. केरळमध्ये मान्सून १ जूनपर्यंत तरी दाखल होणार का, की ‘एल निनो’ अद्याप सक्रिय नसतानाही भारतीय मान्सूनला त्याचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे, अशी विचारणा होत आहे. मान्सून केरळमध्ये दाखल होऊन पुढे महाराष्ट्रापर्यंत पोहोचेपर्यंत आणखी काही दिवस तरी सध्याची होरपळ कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    गुरुवारी कसं असेल हवामान?

    प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये आज, गुरुवारीही उष्ण आणि दमट वातावरणाचा फटका बसू शकतो. सध्या उत्तर आणि वायव्य दिशेकडून वारे येत असल्याने मुंबई तसेच महामुंबई परिसरात उष्णतेचा कहर जाणवत आहे. मुंबईमध्ये बुधवारीही कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही केंद्रांवर कमाल तापमान ३५ अंशांहून अधिक नोंदले गेले. कुलाबा येथे ०.८ तर सांताक्रूझ येथे १.१ अंशांनी कमाल तापमान सरासरीहून अधिक होते. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी, राम मंदिर येथे कमाल तापमानाचा पारा ३८ अंशांहून अधिक होता. राम मंदिर येथे ३८.७, भायखळा येथे ३७.८, विक्रोळी येथे ३६, विद्याविहार येथे ३५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून तुरळक ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा मोठ्या फरकाने अधिक नोंदवले जात आहे.

    Maharashtra TimesNautapa: ‘नवतपा’च्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात पारा 47 अंशापार; रस्त्यांवर शुकशुकाट, 9 दिवस पारा चढण्यामागचं कारण काय?

    महामुंबई परिसरातही तापमानाचा पारा चढा आहे. ठाणे बेलापूर इंडस्ट्रीअल असोसिएशन येथील केंद्रावर ३६.२, डहाणू येथे ३७.४, अलिबाग येथे ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अंदमानमध्ये मान्सून लवकर दाखल झाला असला, तरी त्याचा पुढचा प्रवास रखडल्याने आता केरळमधून संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो यावर राज्यातील पाण्याची स्थिती आणि उन्हाचा फटकाही अवलंबून आहे.

    Maharashtra TimesWeather Update: केरळमधील मान्सून 2-3 दिवस लांबणीवर; मुंबईत घामाच्या धारा कायम, मान्सूनपूर्व सरींबाबत हवामान विभागाचा अंदाज

    उष्ण, दमट वातावरणाचा इशारा

    महामुंबई परिसरामध्ये आणखी किमान दोन दिवस उष्ण वातावरण कायम राहू शकेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभाग प्रमुख बिक्रम सिंग यांनी दिली. गुरुवारीही मुंबईसह ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणासाठी इशारा देण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवू शकेल. ठाणे व रायगड जिल्ह्यात दुपारनंतर पावसाची शक्यताही आहे. पण मुंबईला हा पाऊस दिलासा मिळण्याचा अंदाज नाही.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा