चंद्रपूर आणि गडचिरोलीतील 23 नगरसेवक नॉट रीचेबल असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. या सर्व नगरसेवकांना पाच-पाच लाख रुपये देण्यात आल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या सर्व नगरसेवकांच्या घरावर व्हीप चिटकवून अपात्रतेची कारवाई करणार, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट घोडेबाजाराचे गंभीर आरोप करत मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे जवळपास 23 नगरसेवक संपर्काबाहेर असल्याचा दावा करत त्यांना पैशांच्या जोरावर फोडण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. “आमचे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे जवळपास 23 नगरसेवक नॉट रीचेबल आहेत, आणि मी 100 टक्के सांगतो की, पाच-पाच लाख रुपये देऊन त्यांना उचलले आहे. आमची ती सगळी लोकं पैशाने विकली गेलेली आहेत. आता व्हीप जारी करून त्यांच्या घराला व्हीप चिपकवणार आहोत, आणि त्या नगरसेवकांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही सुरू करू”, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
काँग्रेसच्या नगरसेवकाचा भाजपचे आमदार बंटी भांगडीया यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “फोटो जुना आहे की आताचा हे मी सांगू शकत नाही. परंतु एक नक्की आहे की, चंद्रपूरमध्ये घोडा बाजार प्रचंड तेजीत आहे, आणि त्यांनी तो घोडेबाजार सुरू केलेला आहे. या घोडा बाजाराची गरजही नव्हती, पण आमदार, ठेकेदार झाल्यानंतर पैशांची गर्मी आणि मस्ती येतेच, ती मस्ती त्यामध्ये दिसते आहे,. बिना श्रमाने लोकप्रतिनिधी म्हणून आता आमदाराचे ठेकेदार व्हायला लागले, तर काय नीतिमत्ता, नैतिकता काय राहिली, राजकारणात सत्ता आणि पावर हे दोन्ही एकत्र घेऊन काम होत राहिलं तर सामान्य जनतेचे हाल होणारच आहे”, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.
बंटी भांगडिया यांनी, “तुमचे नगरसेवक तुम्ही सांभाळू शकला नाही, त्यात आमचे नाव का घेताय?”, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले. “जर राज्यात सत्ता नसती तर कुत्रही मागे गेलं नसतं, सत्ता जाऊ दे आणि ने म्हणा उचलत, कोणात किती दम आहे तर. सत्तेचा उपयोग काही लोकांना धाक देण्यासाठी करायचा, बँकेच्या संचालकांना धाक द्यायचा, यामुळे काही लोकांना घाबरवलं. तर एका ठिकाणी सरपंचाचा मुलगा आहे, त्याला तुरुंगात टाकण्याचे धमकी दिली. अशा धमक्या देऊन राजकारण सुरू आहे”, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
प्रत्येकी 5 लाख दिल्याचा वडेट्टीवारांचा आरोप
“मी पुन्हा जबाबदारीने सांगतो, पाच-पाच लाख रुपये त्यांना देण्यात आले आहेत आणि माझ्याकडे तसे पुरावे आहेत. माझ्याकडे माझ्या लोकांचे सगळे रेकॉर्ड आहेत, किती-किती पैसे घेतले, जे झालं ते क्लिअर आहे, आता अॅडव्हान्स दिला आहे. पुन्हा काही देतील. कोणी म्हणाले 10 लाख देऊ, कोणी म्हणतो 15 लाख देऊ, कोणी म्हणतो काँग्रेसचे डबल देऊ अशी चर्चा आहे”, असा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार?
नागपूर विधान परिषद निवडणूक भाजप बिनविरोध करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यावरही विजय वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली. “जर निवडणूक बिनविरोध करायची असेल, तर केवळ एका जागेवर नाही, तर सर्वच्या सर्व जागांवर भाजपने चर्चा करावी. आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षात वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीनही जिल्ह्यांतून उमेदवारांची नावे आली आहेत. पुढील एक-दोन दिवसांत महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार निश्चित केला जाईल”, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा