• Sun. Jun 7th, 2026
    Gokul Elections : ‘गोकुळ डेअरीकडून शेतकऱ्यांना दर दहा दिवसाला 80 कोटींचे दुधाचे बिल’, सतेज पाटील यांचं मतदारांना कळकळीचं आवाहन

    गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आता काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे. सतेज पाटील यांनी ‘राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ पॅनलची घोषणा केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (गोकुळ) 2026 च्या निवडणुकीच्या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीसाठी आपलं पॅनेल आणि मोहीमेचे नाव जाहीर केले आहे. त्यांनी त्यांच्या पॅनेलचे नाव “राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडी” ठेवले असून त्यासंबंधित एक पत्रक त्यांनी जाहीर केले आहे. सत्ता व्यवस्थेत कायम टिकण्यासाठी आणि कोल्हापूरच्या शेतकरी-शेतकरीणींना न्याय देण्याच्या उद्देशाने हा पाऊल उचलल्याचे पाटील यांनी पत्रकात नमूद केले आहे.

    पत्रकात काय म्हटले?

    पत्रकात सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक रचना, ऊस, दूध आणि उद्योग यांमुळे झालेला विकास यांचा उल्लेख करत गोकुळ संघाने ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण वाटा उचलला असल्याचे अधोरेखित केले आहे. गोकुळ ही साडेपाच लाख शेतकऱ्यांना दर दहा दिवसाला सुमारे 80 कोटी रुपयांचे दुधाचे बिल देणारी संस्था असल्याने, तिचे नेतृत्व पक्षीय रंग न घेता सुसंस्कृत, शेतकरी हिताच्या दृष्टीने ठेवणाऱ्या लोकांच्या हाती असावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. गेल्या पाच वर्षांत गोकुळला चालना देण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे आणि भविष्यातही ही संस्था टिकवण्यासाठी योग्य निर्णय घेण्याची गरज असल्याचे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

    पत्रकात सतेज पाटील यांनी गेल्या काही महिन्यांत महायुतीत होत असलेले वाद आणि राजकीय समीकरणातील बदल यांचा उल्लेख करून, गोकुळच्या निवडणुकीकडे “पक्षीय दृष्टिकोनातून” न पाहण्याचे आवाहन केले आहे. खास करून लाखो दूध उत्पादकांचे आर्थिक हीत गोकुळच्या कामकाजावर अवलंबून असल्याने, या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या हिताला प्रथम स्थान देण्यात यावे असे त्यांनी सुचविले. त्यांनी स्वतः अनेकदा शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा दिला असल्याचे सांगितले आणि सभासदांना त्यांचे साथ देण्याची विनंती केली आहे.

    गोकुळच्या मागील निवडणुकीत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी महाडिक गटाची 25 वर्षांची सत्ता उलथवून सत्ता मिळवली होती. मात्र त्यानंतरचे राजकीय समीकरण बदलले असून सध्या हसन मुश्रीफ हे महायुती आणि सतेज पाटील हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यामुळे या निवडणुकीत दोघेही काय भूमिका घेतील, याकडे जिल्ह्यातील सर्वच राजकीय आणि शेतकरी वर्तुळांचे लक्ष लागले होते.

    आता आमदार सतेज पाटील यांनी पॅनेल जाहीर केले आहे. गोकुळची निवडणूक ही फक्त संस्थात्मक स्पर्धा नसून ग्रामीण अर्थकारणाशी थेट जोडलेली आहे. निवडणुकीची पारदर्शकता, आर्थिक आणि शेतकरी हितासाठी ठरवलेले धोरण हे मुख्य ‘मुद्दे’ असतील. त्यामुळे सतेज पाटील यांनी “राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडी” मार्फत या मुद्यांकडे लक्ष वेधले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा