• Sat. Jun 6th, 2026

    कोकणवासी दुहेरी कोंडीत! मुंबई-गोवा महामार्गावर 12 पुलांचं काम रखडलं, 12 तासांचा प्रवास, टोलवसुलीची मात्र घाई

    कोकणवासी दुहेरी कोंडीत! मुंबई-गोवा महामार्गावर 12 पुलांचं काम रखडलं, 12 तासांचा प्रवास, टोलवसुलीची मात्र घाई

    Mumbai-Goa Highway Traffic: रविवारी मुंबई-गोवा महमार्गवरील वाहतूक कोंडीमुळे प्रवासी संतापले असताना टोलवसुलीमुळे यात भर पडली. महामार्गाचे काम अजून पूर्ण सुद्धा झाले नाहीत तरी टोलवसुलीची घाई का असा सवाल केला जात आहे.

    प्रसाद रानडे, रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील खारपाडापाठोपाठ खांब येथेही टोलवसुली सुरू करण्याच्या हालचाली सुरू असताना महामार्गावरील प्रवाशांचा वाहतूककोंडीचा जाच रविवारी आणखी वाढला. रायगडमधील माणगाव-इंदापूर आणि रत्नागिरीतील संगमेश्वर परिसरात वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने प्रवासी, पर्यटकांचे हाल झाले. महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना टोलवसुली सुरू असल्याने प्रवाशांच्या संतापात वाहतूककोंडीने भर टाकली.

    माणगव-इंदापूर बायपासचं काम रखडलं

    मुंबईहून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही मार्गिकांवर रविवारी वाहतूककोंडी होती. रायगड जिल्ह्यातील माणगाव- इंदापूर परिसरात वाहतूककोंडीचे चित्र रविवारी भीषण बनले होते. रविवारी सकाळपासूनच वाहतूककोंडी सुरू झाली. तिथे काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे पुलाच्या एका खांबामुळे माणगाव-इंदापूरच्या बायपासचे काम अद्यापही रखडले आहे. यामुळे तिथे नेहमी होणारी वाहतूककोंडी रविवारी आणखी वाढल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचे हाल झाले. संगमेश्वर येथील शास्त्रीपुलाजवळही वाहतूककोंडी झाली. यामुळे प्रवासी, पर्यटकांना मोठा मनस्ताप झाल्याचे सिंधुदुर्ग येथील मंदार मराठे यांनी सांगितले.

    Maharashtra TimesPune-Satara Highway: पुणे-सातारा प्रवास फक्त 1 तासात; महामार्गावर बहुमजली उड्डाणपुलांची योजना, शिरवळ, खंबाटकी घाटातील कोंडी फुटणार

    मुंबई-गोवा महामार्गावर टोल सुरू करण्यात आला असला तरी वाहतूककोंडीमुळे प्रवासासाठी लागणारा वेळ कमी झालेला नाही. मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासासाठी लागणारा दहा ते बारा तासांचा वेळ अद्यापही कायम आहे. त्यामुळे महामार्गावर टोल सुरू करण्यामागचा उद्देश व इतकी घाई कशासाठी, असा संतप्त प्रश्न पर्यटक, प्रवासी करीत आहेत.

    टोलनाक्यांना विरोध

    रायगड जिल्ह्यातील खारपाडा व खांब या टोलनाक्यांनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील हातिवले व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली ओसरगाव हे टोलनाके सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. मात्र, या टोलनाक्यांना रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील काही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी विरोध केला आहे. ‘महामार्गाचे काम अपूर्ण आहे. रत्नागिरीतील संगमेश्वर ते हातखंबा या टप्प्यात महामार्गाचे काम सुरू आहे. महामार्गावरील तब्बल बारा पुलांचे काम अद्यापही सुरू आहे. ही कामे अपूर्ण असताना टोलचा भुर्दंड अन्यायकारक आहे, अशी प्रतिक्रिया माणगाव येथील वाहनचालक अनिकेत कांबळे यांनी दिली.

    महामार्गावरील टोलवसुलीविरोधात सामान्य नागरिकांनीही बाह्या सरसावल्या आहेत. सिंधुदुर्ग येथील नागरिक संजय सावंत यांनी लोकप्रतिनिधींना पत्र पाठवले आहे. महामार्गावरील कामे अपूर्ण असताना खारपाडा टोल प्लाझावर सुरू झालेली वसुली हा कोकणवासीयांच्या खिशात हात घालण्याचा प्रकार आहे, असे सावंत यांनी पत्रात म्हटले आहे.

    Maharashtra TimesPune News: कोंडीमुळे काम पूर्ण होण्यापूर्वीच उड्डाणपूल खुला; 24 तासांत दोन अपघात, पुण्यात रक्षक चौकातील पुलाची चर्चा

    खारपाडा येथे आज आंदोलन

    महामार्गावरील खारपाडा टोलनाका बंद करावा, या मागणीसाठी जनआक्रोश समिती खारपाडा टोल प्लाझावजळ आज, सोमवारी सकाळी १० वाजता ठिय्या आंदोलन करणार आहे. ‘हे आंदोलन केवळ एका दिवसापुरते नसून, टोल बंद होईपर्यंत कायम राहणार आहे. महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी वारंवार मुदतवाढ मिळत आहे. त्यामुळे आधी महामार्ग पूर्ण करा, त्यानंतरच टोल सुरू करा’, अशी भूमिका जनआक्रोश समितीचे सचिव रुपेश दुर्गे यांनी मांडली.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा