BMC Mayor Ritu Tawde: ही केवळ दोन वर्षांची आकडेवारी आहे. यापेक्षा आणखी मागे जाऊन पाहिल्यास आणखी मोठी संख्या पुढे येईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.
महापौर रितू तावडे यांनी शुक्रवारी ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापामध्ये त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली. सर्वप्रथम सर्वाधिक गंभीर मानल्या जाणाऱ्या बोगस जन्मदाखल्यांबाबत त्यांना विचारण्यात आले. हे नेमके कशासाठी करण्यात आले असावे, असे विचारताच महापौर म्हणाल्या, ‘एका विशिष्ट समाजातील लोकांच्या नावावर बहुतांश दाखले आहेत. व्होटबँक टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी काँग्रेसने केलेला हा प्रयत्न होता.’
Party Formation Process : कॉकरोच जनता पार्टी फक्त सोशल मीडिया पेज, खराखुरा राजकीय पक्ष स्थापित करण्यासाठी काय करावं लागतं?
मुंबईत बंद पडलेले जलतरण तलाव, सायकल ट्रॅकची दुरवस्था याकडेही वार्तालापामध्ये महापौरांचे लक्ष वेधण्यात आले. अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई आणि फुटपाथ याबाबत महापौर म्हणाल्या, ‘२५ वर्षांपासून मुंबईची पुरती वाट लावून टाकली. फुटपाथ हा मूळ मुंबईकरांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे. यासाठी अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू आहे. ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार आहे.’ हे नमूद करताना त्यांनी या कारवाईची दुसरी मजेशीर बाजूदेखील सांगितली. रस्त्यावर, फुटपाथवर विक्रेते दिसत नसल्याने आम्ही भाजीपाला कुठे खरेदी करायचा ? असा प्रश्न मुंबईकरांकडून विचारला जातो, असे तावडे म्हणाल्या. यावर त्यांचे लक्ष मुंबईतील मंडयांच्या दुरवस्थेकडे वेधण्यात आले. त्यावर त्या म्हणाल्या, ‘मंडई नीट असायला हव्यात, यात शंकाच नाही.
पुनर्विकासात विकासक तळमजल्यावरील गाळे स्वतःकडे ठेवतात आणि मंडईसाठी पहिल्या मजल्यावर जागा देतात. अशा ठिकाणी कुणी खरेदीसाठी जात नाही. त्यामुळे चांगल्या मंडईसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत.’ अनियमित फुटपाथ, विकासकांकडून केली जाणारी तोडफोड याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात असल्याचेही तावडे यांनी सांगितले.
El Nino: यंदाच्या खरीपावर ‘एल निनो’चं संकट! राज्यात सरासरी 88 टक्के पावसाचा अंदाज, प्रभाव कधीपासून दिसणार?
हरित बेटे विकसित करणार
मुंबईचे प्रदूषण वाढत आहे आणि दुसरीकडे झाडांची संख्या कमी होत आहे. हे पाहता मुंबईत हरित बेटे विकसित करणे हे आपले प्रमुख ध्येय असल्याचे रितू तावडे म्हणाल्या. मुंबईत जागेचा तुटवडा आहे, परंतु जिथे कुठे जागा मिळेल त्या ठिकाणी हरित पट्टा करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
कथित कॅथ लॅब घोटाळा, तानाजी सावंत मनसेच्या निशाण्यावर! संदीप देशपांडेंचे गंभीर आरोप
झाड दुर्घटनेबाबत धोरण आवश्यक
मुंबईत झाडे पडण्याच्या घटना वारंवार घडत असतात. अनेकदा झाडे खासगी जागेत असल्याचे सांगत महापालिका हात वर करते. याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना तावडे म्हणाल्या, ‘झाड पडून जखमी किंवा मृत्यू होण्याच्या घटना दुर्दैवी आहेत. पालिकेच्या जागेतील आणि खासगी जागेतील झाड असा भेदभाव व्हायला नको, हे मान्य आहे. परंतु त्यासाठी आवश्यक धोरण आखण्याची गरज असून, त्यासाठी माझा नक्कीच प्रयत्न असेल.’
