• Fri. Jun 5th, 2026
    राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर


    Maharashtra Live News: वांद्रे पूर्वेकडील गरीबनगरमधील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी पश्चिम रेल्वेच्या कारवाईला हिंसक वळण लागले. दिवसभर कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेला विरोध सायंकाळी आक्रमक झाला. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास जमावाने पोलिसांवर तुफान दगडफेक केली. दगडफेकीत सात पोलिस कर्मचारी आणि तीन आंदोलक असे एकूण १० जण जखमी झाले. पोलिसांनी लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, ‘राज्यात केवळ एक महिना पुरेल इतकाच पेट्रोल-डिझेलचा साठा उपलब्ध आहे’, असे वक्तव्य अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी केले. त्यानंतर, ‘कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्याकडे पुरेसा इंधनसाठा उपलब्ध आहे’, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed