ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आगामी काळातील पक्षाच्या वाटचालीबाबत या बैठकीत सूचना देण्यात आल्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी काळात पक्षाने कशी वाटचाल करावी? याबाबत रणनीती आखली गेल्याची माहिती आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी बैठकीत नेमकी काय-काय चर्चा झाली? या विषयी शशिकांत शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली. शशिकांत शिंदे यांना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. पण शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं स्पष्ट केलं. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यावरही शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
“राज्यात पक्षाच्यावतीने सक्षम विरोधी पक्ष म्हणून उभे राहण्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. अनेक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी आपापली मते मांडली, मुद्दे मांडली आहेत. विलीनीकरणाबाबत आधीच स्पष्ट करतो, विलीनीकरणाचा विषय संपलेला आहे. यापुढे विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा होणार नाही. आम्ही सक्षमपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणून महाराष्ट्रात जाणार आहोत”, असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं.
“रोहित पवार यांनी बाहेर काय मीडिया बाईट दिली ते मला माहिती नाही. मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रतिक्रिया देतोय. त्यांच्या काही सूचना असतील तर ते मी ऐकून घेईन. पक्षाच्या चौकटीतून, शिस्तीतून आम्ही व्यवस्थितपणे सर्व एकत्र काम करु. ज्या काही खंत तुमच्या माध्यमातून मला कळत आहेत त्या देखील दूर करु. एकत्रितपणे भविष्य काळात आक्रमकपणे आंदोलन करणार आहोत. संघटना बांधणार आहोत. दोन दिवसांचं शिबिर घेतोय”, अशी माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली.
“पक्षाच्याबाबत भूमिका घेत असताना चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे. आज नीट परीक्षेचा प्रश्न आहे, पेट्रोल-डिझेलचा भाववाढ, पेट्रोल-डिझेलची टंचाई आहे. देशाला महागाईने ग्रासले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन येत्या काही दिवसांत पक्ष मजबूत करायचा. संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यायचं. एकवाक्यतेने, एका विचाराने पक्षाच्या चौकटीतूनच जाण्याचा प्रयत्न करु. कुणी स्वतंत्र विचार मांडत असेल तरी त्याला बरोबर घेऊन एकत्र काम करण्याचा प्रयत्न करु”, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
शशिकांत शिंदे विलीनीकरणाबाबत नेमकं काय म्हणाले?
“मी स्पष्ट सांगतोय, मी विनंती करतो, संभ्रम अवस्था निर्माण होते. कोणत्याही प्रकारचा विलीनीकरणाचा विषय नाही. यापुढे विलीनीकरणाचा विषय संपलेला आहे. मी मागेही सांगितलं होतं. आताही सांगतो, अशी कुठलीही चर्चा भविष्यात होणार नाही. शरद पवार यांना भेटायला येणारे नेते बरेच आहेत. ते अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत काम करत आहेत. एखादा नेता भेटायला आला, तो कोणत्या कारणासाठी आला ते न पाहता वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. शरद पवारांनी देशाच्या पंतप्रधानांबाबत भूमिका मांडली. देश हितासाठी भूमिका मांडली. त्यावर लगेच पक्षाचा अँगल देण्याची गरज नाही, असं मला वाटतं”, अशी भूमिका शशिकांत शिंदे यांनी मांडली.
“१५ ऑगस्टनंतर आम्ही महाविकास आघाडी म्हणून सर्व पक्ष संयुक्तपणे राज्यव्यापी दौरे करणार आहोत. आम्ही सक्षमपणे जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरनात आहोत. त्याआधी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात संघटना मजबूत करण्याची भूमिका घेऊन जाऊ. तशा सूचना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्या आहेत”, अशीदेखील माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा