मुंबईतील वांद्रे रेल्वे परिसरातील अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान दुसऱ्या दिवशी मोठा गोंधळ निर्माण झाला. नागरिकांनी कारवाईला विरोध करत पोलिसांशी धक्काबुक्की केली, तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: वांद्रे येथील अतिक्रमण कारवाई सध्या चर्चेत आली आहे. ही कारवाई एकूण चार दिवस सुरु राहणार आहे. काल पहिला दिवस होता. तर या कारवाईचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, आज दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मोठा गोंधळ झाल्याची स्थिती आहे. वांद्रे रेल्वे परिसरातल्या अतिक्रमण हटाव कारवाईला नागरिकांनी विरोध केला. अतिशय आक्रमक होत त्यांनी पोलिसांना धक्काबुक्कीही केल्याचे दिसून आले आहे, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य स्वरुपाचा लाठीचार्ज केला आहे. सध्याच्या घडीला याठिकाणी प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढती गर्दी पाहता पोलिसांनी आता अधिकची कुमक मागवल्याची माहितीही पुढे येत आहे. मोठ्या फौजफाट्यासह सलग दुसऱ्या दिवशीही तोडक कारवाई सुरु आहे.
अतिक्रमण कारवाईला सुरुवात कशी झाली?
दरम्यान, वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरातील गरीब नगर आणि हद्दीतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई सुरु आहे. आरपीएफ आणि जीआरपी यांच्यामार्फत ही संयुक्त कारवाई केली जाते आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच एका विदेशी ब्लॉगरने वांद्रे येथील रेल्वेपरिसरातील झोपडपट्टी अतिक्रमणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता त्यानंतर या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या. विविध माध्यमांनी या प्रकारावर चर्चा केली होती. दरम्यान, रेल्वेच्या जागेवर सुमारे पाच हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रावर अतिक्रमण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
यापूर्वीही कारवाई
यापूर्वीही या परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र संबंधित रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर कारवाईला स्थगिती मिळाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला असून मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
Pramod Jathar: मोदींसाठी काय पण! म्हणाले तर समुद्रात उडी मारु, PM एका रात्रीत काहीही बंद करु शकतात; भाजप आमदाराचं वक्तव्य
सौम्य लाठीचार्ज
कारवाईदरम्यान परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी कारवाईला विरोध करत घोषणाबाजी केली. काही जणांनी पोलिसांच्या दिशेने बाटल्या आणि इतर वस्तू फेकल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, परिसरातील परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त मागवला आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कारवाई सुरू ठेवण्याच्या तयारीत असून चार दिवस ठरवलेली ही कारवाई नागरिकांच्या अडथळ्यामुळे पुढील काही दिवस आणखी चालू शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा