मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा उपोषणाचा इशारा देणारे मनोज जरांगे यांच्यावर त्यांचेच एकेकाळचे माजी सहकारी अजय बारस्कर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईत लाखो मराठा बांधवांना घेऊन गेल्यानंतर हैदराबाद गॅझेटचा जीआर घेऊन आलात, गुलाल उधळला, विजयाचा जल्लोष केला मग आता पुन्हा उपोषण कशासाठी? असा थेट सवाल बारस्कर यांनी उपस्थित केला. जरांगेंच्या ठरलेल्या सेटिंग पूर्ण झाल्या नाहीत, त्यामुळेच त्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय, असा आरोप बारस्कर यांनी केलाय.