• Sun. Jun 14th, 2026

    मनोरी प्रकल्पामुळे मुंबईची तहान भागणार; समुद्रातून दोन बोगद्यांनी पाणी आणणार, पहिल्या टप्प्यात २० कोटी लीटर पाणी

    मनोरी प्रकल्पामुळे मुंबईची तहान भागणार; समुद्रातून दोन बोगद्यांनी पाणी आणणार, पहिल्या टप्प्यात २० कोटी लीटर पाणी

    Manori Desalination Plant: मुंबई शहरात दररोज १५% पाणीपुरवठ्याच्या तुटवडा होतो. कारण महापालिकेच्या ३,९७५ एमएलडी पुरवठ्यातून ४,६६४ एमएलडी पाण्याची आवश्यक मागणी पूर्णपणे भागवली जात नाही, यामुळे मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पाची गरज निर्माम झाली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी, मुंबई महापालिकेकडून समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यासाठी मालाड मनोरी येथे नि:क्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी सीआरझेड (किनारा नियमन क्षेत्र)ची मंजुरी केंद्र सरकारकडून अखेर मिळाली असून, तसे पत्रच ११ मे रोजी जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या मोठ्या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला येत्या पावसाळ्यानंतर गती दिली जाणार आहे. सीआरझेडनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मेरिटाइम बोर्डाची मंजुरी बाकी असून, येत्या आठ ते दहा दिवसांत महापालिकेला ही मंजुरीही मिळेल. या प्रकल्पातून पाच वॉर्डांची तहान भागवली जाणार आहे.

    समुद्राचे खारे पाणी गोडे करणार

    मुंबईला दररोज तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, अपर वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून ४०० कोटी लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वाढती पाण्याची गरज भागवण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणारा नि:क्षारीकरण प्रकल्प मनोरी येथे राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला खरा; मात्र गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा प्रकल्प निविदा प्रक्रियेतच अडकला होता. अखेर हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जीव्हीपीआर कंपनीची निवड करण्यात आली आहे. निवड करताना दुसरीकडे विविध मंजुऱ्याही आवश्यक होत्या.Maharashtra TimesDevendra Fadnavis: महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पाच वर्षांत घर मिळणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ३० लाख घरांना मंजुरी

    यामध्ये सीआरझेड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मेरिटाइम बोर्डाचीही मंजुरी मिळवण्यासाठी धडपड सुरू असतानाच ११ मे रोजी सीआरझेडची मंजुरी मिळाल्याचे पत्र महापालिकेला मिळाले आहे. यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी प्रकल्पस्थळी भेट देऊन माहिती घेणार आहेत. त्यानंतर त्यांच्याकडूनही आठ ते दहा दिवसांत मंजुरी मिळेल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

    पहिल्या टप्प्यात २० कोटी लिटर पाणी

    मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पात समुद्रात दोन किमी लांबीचे दोन बोगदे पाणी आणण्यासाठी आणि पाणी सोडण्यासाठी बांधावे लागणार आहेत. या प्रकल्पातून समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून पहिल्या टप्प्यात दररोज २० कोटी लिटर, तर दुसऱ्या टप्प्यात २० कोटी लिटर असे एकूण ४० कोटी लिटर पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पासाठी तीन हजार ५२० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. हा खर्च साधारण एक हजार कोटी रुपयांनी वाढला आहे. प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

    Maharashtra TimesMonsoon Update: केरळमध्ये मान्सूनआगमन पाच दिवस आधीच! महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरही पावसाळी वातावरण; हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज

    प्रकल्पाचे लाभ

    प्रकल्प पूर्ण होताच ‘पी उत्तर’ मालाड, ‘पी दक्षिण’ गोरेगाव, ‘आर मध्य’ बोरिवली पश्चिम, ‘आर उत्तर’ दहिसर आणि ‘आर दक्षिण’ कांदिवली या वॉडाँना प्रकल्पातून पाणी मिळेल.
    सध्या भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई शहर व पश्चिम उपनगरांना पाणीपुरवठा होतो. मनोरीतील प्रकल्प कार्यान्वित होताच, भांडुप संकुलातील या पाच वॉडांच्या वाट्याचे पाणी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे संकुलातील पाणी गरज असेल तेथे वळते करता येणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा