• Sun. Jun 7th, 2026

    नाशिकमध्ये रस्तेविस्ताराचा ‘मास्टर प्लॅन’; ‘एनएमआरडीए’चा रिंगरोडसाठी पुढाकार, शेतकऱ्यांसमोर तीन पर्याय

    नाशिकमध्ये रस्तेविस्ताराचा ‘मास्टर प्लॅन’; ‘एनएमआरडीए’चा रिंगरोडसाठी पुढाकार, शेतकऱ्यांसमोर तीन पर्याय

    Nashik News: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंग रोड बांधण्यात येत असून एनएमआरडीएने शेतकऱ्यांसमोर रिंगरोडच्या विकासासाठी तीन पर्याय मांडले आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    विनोद पाटील, नाशिक : सिंहस्थ परिक्रमा मार्ग अर्थात, बाह्य रिंगरोडला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दर्शविल्यानंतर नाशिक महानगर विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) रिंगरोडभोवतालच्या परिसराच्या विकासासाठी आता ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे.

    कोणते तीन पर्याय?

    रिंगरोडभोवती असलेल्या नाशिक शहरासह नाशिक आणि दिंडोरी तालुक्यातील सोळा गावांच्या विकासासाठी नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला असून, शेतकऱ्यांना तीनपैकी एका पर्यायाची निवड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांनी तीन पर्यायांपैकी एक पर्याय स्वीकारल्यास नाशिक शहर आणि दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाड, त्र्यंबकेश्वरची कनेक्टिव्हिटी जलद होणार आहे. मुंबई, पुण्याच्या धर्तीवर राज्य शासनाने नाशिक महानगर क्षेत्रासाठी दि. १ मार्च २०१७ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करीत नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना केली. त्यानंतर १२ जानेवारी २०१८ रोजी शासनाने नवीन अधिसूचना जारी करीत नाशिक महानगर क्षेत्रासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्ती केली.Maharashtra TimesAiroli-Katai Naka Corridor: उड्डाणपुलाची रखडपट्टी; ऐरोली-काटई नाका मार्गाचे भूसंपादन अपूर्ण, डोंबिवली-नवी मुंबई वाहतूककोंडी कायम राहणार?

    त्यानंतर प्राधिकरणाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर केला. आता विकास योजना जाहीर केल्यानंतर विकास योजनेच्या क्षेत्रात रस्ते, विविध पायाभूत सुविधांसाठी आरक्षणे टाकली जाणार असून, त्यानुसार या क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासाला गती मिळाली आहे. त्याचा पहिला टप्पा आता रिंगरोडपासून सुरू झाला असून, ६६ किलोमीटरच्या रिंगरोडभोवती असलेल्या आणि ‘एनएमआरडीए’मध्ये समाविष्ट असलेल्या गावांच्या विकासासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार केला आहे. त्यामुळे या गावांचा जलदगतीने विकास होऊन एनएमआरडीए क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. परिसरातील रस्ते, ओझर विमानतळ, रेल्वे स्थानक विकासामुळे आधुनिक नाशिक तयार होणार असल्याचे चित्र आहे.

    मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण

    ‘एनएमआरडीए’चे आयुक्त जलज शर्मा आणि उपसंचालक दीपक वराडे यांनी हा ‘मास्टर प्लॅन’ तयार केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर या तीनही प्रस्तावांचे सादरीकरण केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावामुळे नाशिकचा विकास झपाट्याने होईल असे सांगत त्याला हिरवा कंदील दर्शविला आहे. त्यामुळे या ‘मास्टर प्लॅन’ची लवकरच अंमलबजावणी केली जाईल.

    ‘एनएमआरडीए’ क्षेत्राच्या विकासासाठी रस्त्यांचे नेटवर्क तयार करणे आवश्यक आहे. या पर्यायामुळे रस्त्यांचे जाळे तयार होणार असून, या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. – दीपक वराडे, उपसंचालक, एनएमआरडीए

    पहिला पर्याय

    एनएमआरडीए सर्व १२ मीटर, १८ मीटर, २४ मीटर किंवा ३० मीटर रुंदीचे रस्ते आणि सार्वजनिक सुविधा स्वतःच्या खर्चाने विकसित करेल, तसेच भूखंडांची आखणीही करेल आणि जमिनीचा ६० टक्के हिस्सा जमीनधारकांना सुपूर्द करेल.

    पर्याय दुसरा

    एनएमआरडीए रस्त्यांसाठी आणि सार्वजनिक सुविधांसाठी असलेल्या जागेपैकी ४० टक्के जागा आपल्या ताब्यात घेऊन ती विकसित करेल आणि जमीनधारक आपल्या कल्पनांनुसार स्वतःची जागा विकसित करण्यास स्वतंत्र असेल. या दोन्ही योजनांमध्ये जमीनधारकांना प्राधिकरणाला प्रीमियम देण्याची आवश्यकता नाही.

    Maharashtra TimesNavi Mumbai News: नवी मुंबईतील स्थानकांचा तिढा कायम; ‘सिडको’कडून मध्य रेल्वेकडे ताबा देणार, रेल्वे प्रवाशांची गैरसोय कायम राहणार

    तिसरा पर्याय

    एनएमआरडीए केवळ रस्त्यांच्या विकासावर नियंत्रण ठेवेल आणि उर्वरित जागा जमीनधारकाकडेच राहील. सार्वजनिक सुविधांसाठी जागा आरक्षित करणे, तिचा विकास करण्यासाठी ती जमीन जमीनधारक ‘एनएमआरडीए’कडे हस्तांतरित करेल. त्या जागेचा विकास एनएमआरडीए करेल. परंतु, जमीनधारकाला

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा