• Sun. Jun 14th, 2026
    Anand Paranjpe : आनंद परांजपे भावूक, 14 वर्षांनी टेंभी नाक्यावर आल्यावर कंठ दाटून आला

    आनंद परांजपे 14 वर्षांनी शिवसेनेत परतले आहेत. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते ठाण्यात टेंभी नाका येथील दिवंगत आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात दाखल झाले. यावेळी आनंद परांजपे भावूक झाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    विनित जांगळे, ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तब्बल 14 वर्षांनी माजी खासदार आनंद परांजपे यांची घरवापसी झाली आहे. आनंद परांजपे हे पूर्वी शिवसेनेत होते. त्यांचे वडील दिवंगत खासदार प्रकाश परांजपे हे दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे निकटवर्तीय होते. ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे यांचं मोठं वलय होतं. आनंद परांजपे यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्यानंतर आज ठाण्यात टेंभी नाका येथील आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी आनंद दिघे यांच्या स्मृतीला अभिवादन केले. दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रतिमेला अभिवादन करताच शिवसेनेतील जुन्या आठवणींचा पट परांजपे यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. त्यामुळे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यावेळी “आज माझी खरी घरवापसी झाली”, अशी प्रतिक्रिया देताना परांजपे भावनिक झाले.

    मुंबईत पक्षप्रवेश सोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी परांजपे यांनी आनंदाश्रमात हजेरी लावली. तसेच दिघे यांच्या शक्तिस्थळावर जाऊन परांजपे यांनी वंदन केले. यावेळी जुने शिवसैनिक उपस्थित होते. “१४ वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेत परतलो आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि आनंदाचा आहे. आनंदाश्रम ही केवळ वास्तू नाही, तर माझ्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. लहानपणापासून वडील दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांच्यासोबत येथे येत होतो. येथेच शिवसेनेचे संस्कार मिळाले”, असेही परांजपे यांनी नमूद केले. याप्रसंगी शिवसेना ठाणे जिल्हा सचिव विलास जोशी, ठाणे विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार, प्रकाश पायरे, अभिजित दरेकर उपस्थित होते.
    Maharashtra TimesAnand Paranjpe : तब्बल 14 वर्षांनी वर्तुळ पूर्ण होणार; शिवसेनेत ‘आनंद’ येणार? बालेकिल्ल्यात शिंदेंचं बेरजेचं राजकारण

    जुन्या आठवणींना उजाळा

    “सन २००८ मध्ये याच आनंदाश्रमात मला पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढविण्याबाबत सांगण्यात आले होते. त्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि ठाणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीची जबाबदारी दिली. आज पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळत आहे. शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं. “पक्ष वाढीसाठी जी काही जबाबदारी दिली जाईल ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन. कार्यकर्त्यांशी पुन्हा नव्याने जोडले जाऊन संघटना बळकट करण्यावर भर असेल,” असे त्यांनी सांगितले.दरम्यान, आनंद परांजपे 2008 मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत जिंकून आले होते. त्यानंतर 2009 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकीत जिंकून गेले होते. पण 2012 मध्ये त्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी त्यावेळी शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पण त्यांचा दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. पण पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची देखील माहिती आहे. यानंतर आता परांजपे यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा