• Sat. Jun 6th, 2026
    Raju Shetti On Sugar Export: आई जेवू घालीना अन् बाप भीक मागू देईना! साखर निर्यातबंदीवरुन राजू शेट्टींची केंद्रावर टीका

    Raju Shetti Criticize Central Govt Decision: देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचे शेट्टी यांचे म्हणणे आहे.

    राजू शेट्टी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘जागतिक बाजारपेठेत साखरेला चांगला दर मिळत असताना साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय मूर्खपणा आणि भंपकपणाचा आहे. साखरेचा दर वाढवायचा नाही आणि निर्यातीवरही बंदी घालायची या सरकारच्या धोरणामुळे आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना,’ अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे,’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गुरुवारी केली.

    अमेरिका, इस्रायल आणि इराण या देशांतील संघर्षामुळे जागतिक व्यापारासह निर्यातीला अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

    Maharashtra Timesमंत्री Narhari Zirwal ॲक्शन मोडमध्ये, जेजुरीच्या ‘हळद भंडारा’बाबत मोठा निर्णय
    ‘देशात गेल्या चार वर्षांपासून उसाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवली नसल्याने साखरेचे दर स्थिर आहेत. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहे. एमएसपी वाढत नसल्याने किमान साखर निर्यात करून उत्पन्न मिळवता येते, तर त्यावरही बंदी घातल्याने कारखान्यांना फटका बसणार आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे,’ असे शेट्टी यांनी सांगितले.
    Maharashtra TimesPune News : खरेखुरे देवदूत! पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये टायमर जोडलेली बॉम्बसदृश्य वस्तू, डॉ गायकवाडांना रुग्णांची काळजी, स्वतः हाताने उचलून बॉक्स बाहेर नेला
    ‘सत्ताधारी कारखानदारांवर कारवाई नाही’
    ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार ऊस तोडल्यापासून १४ दिवसांच्या आत साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना रास्त किफायतशीर रक्कम (एफआरपी) वेळेवर देणे बंधनकारक आहे. देशात १२ हजार कोटी आणि राज्यात तीन हजार कोटी रुपयांची देयके कारखानदारांकडे थकीत आहेत. थकबाकी ठेवल्यास कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र, राज्यातील ८० टक्के कारखानदार सत्ताधारी भाजप आणि मित्र पक्षातील असल्याने कारवाई होत नाही,’ अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

    १५ लाखांहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी
    महाराष्ट्रात १५ लाखांहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी आहेत. राज्यातील २०० पेक्षा जास्त साखर कारखाने लाखो कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहेत. ऊसतोड कामगार, ट्रक मालक, ट्रॅक्टरचालक, वाहतूकदार, छोटे व्यापारी, किराणा दुकानदार, हॉटेल व्यवसायिक अशा हजारो व्यवसायांचे अर्थकारण साखर उद्योगावर उभे आहे. निर्यातबंदीमुळे साखरेचे दर कोसळणार, कारखान्यांची रोकड अडणार आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’ला बसणार आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा