• Mon. Jun 15th, 2026
    Pune News : धावत्या रेल्वेत उमटला नवजीवाचा पहिला आवाज, मातृदिनाच्या पूर्वसंध्येलाच बाळाचा जन्म; RPFच्या जवानांचं कौतुक

    Pune Supaul Bihar Express Woman Gives Birth : पुण्याहून सुटणाऱ्या बिहार एक्स्प्रेसमध्ये एका महिलेनं एका गोंडसा बाळाला जन्म दिला. धावत्या रेल्वेतच उमटला नवजीवाचा पहिला आवाज.

    पुणे सुपौल एक्स्प्रेस महिलेची प्रसूती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी : पुणे-सुपौल (बिहार) एक्स्प्रेसच्या धावत्या रेल्वेत महिलेला अचानक सुरू झालेल्या प्रसूती वेदनांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले; परंतु जागतिक मातृदिनाच्या पूर्वसंध्येला रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांनी दाखवलेल्या धैर्य, तत्परता आणि माणुसकीमुळे एका नव्या जीवाचे सुरक्षित स्वागत झाले. रोक्साना खातून (वय 28) या पतीसोबत पुणे-सुपौल एक्स्प्रेसच्या गार्ड बाजूच्या जनरल डब्यातून बिहारकडे प्रवास करीत होत्या. पुण्याहून रेल्वे दौंडच्या पुढे गेल्यानंतर रोक्साना यांना अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. रेल्वेत वैद्यकीय सुविधा नसल्याने कुटुंबीय घाबरून गेले होते. डब्यातील प्रवाशांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

    प्रवाशांच्या मदतीने डब्यातच आवश्यक व्यवस्था

    या घटनेची माहिती मिळताच रेल्वे संरक्षण दलाचे कॉन्स्टेबल सोमनाथ पाठाडे आणि हेड कॉन्स्टेबल विश्वजित काकडे यांनी तत्काळ त्या डब्याकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी जराही वेळ न दवडता महिलेला धीर दिला. प्रवाशांच्या मदतीने डब्यातच आवश्यक व्यवस्था करण्यात आली. वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसतानाही जवानांनी प्रसंगावधान राखून सुरक्षित प्रसूती पार पाडण्यास मदत केली. काही वेळातच बाळाच्या रडण्याचा आवाज डब्यात घुमला आणि तणावाचे वातावरण आनंदात बदलले. त्यानंतर अहिल्यानगर स्थानकावर आई आणि नवजात बाळाला सुरक्षितपणे खाली उतरवून 108 रुग्णवाहिकेद्वारे ‘सिव्हिल हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचे सांगितले.
    Maharashtra TimesThane News: ‘ठाणे-घोडबंदर’ आता सुसाट! रुंदीकरणासाठी भूसंपादनाचा मार्ग मोकळा; ठाणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार

    रेल्वेच्या जागांना मिळणार मालकी हक्क

    राज्यातील रेल्वेच्या हजारो एकर जमिनींच्या मालकी हक्काबाबत स्पष्ट नोंदी नसल्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अखेर रेल्वेने सादर केलेल्या प्रस्तावानुसार महसूल विभागाने स्वतंत्र सात-बारा उतारे तयार करून ‘भारत सरकार रेल्वे’ या नावाने मालकी हक्क नोंदविण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयामुळे रेल्वेच्या मालकीच्या जमिनींचे सर्व्हे क्रमांक, नकाशे आणि निश्चित हद्दींची पडताळणी करून संबंधित गाव नकाशांमध्ये शेवटचा सर्व्हे क्रमांक किंवा गट क्रमांक निश्चित करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या जमिनींची नोंद सात-बारा आणि मिळकत पत्रिकांमध्ये ‘भारत सरकार रेल्वे’ या नावाने करण्यात येईल. यासाठी आवश्यक कार्यवाहीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.राज्यात मूळ सर्वेक्षण आणि जमाबंदी प्रक्रियेनंतर; तसेच रेल्वेमार्गांच्या विस्तारासाठी खासगी जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, या जमिनींच्या मालकी हक्काचे पुरावे उपलब्ध नसल्याचे समोर आले होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करून सात-बारा व मालमत्ता पत्रिकांमध्ये स्वतंत्र नोंदी करण्याची मागणी केली होती. याबाबत सर्वप्रथम ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महसूल विभागाने ही प्रक्रिया सुरू केली आहे.
    Maharashtra TimesWeather Alert: राज्यात उन्हामुळे काहिली! वादळी पावसाचा इशारा तरीही तापमान चढेच राहणार; मराठवाडा, विदर्भ, कोकणात ‘अलर्ट’

    ‘भारत सरकार रेल्वे’

    मूळ सर्वेक्षणातील नकाशे आणि आकारबंदांचा अभ्यास करून, रेल्वेमार्गांची सलग हद्द निश्चित केली जाणार आहे. त्यासाठी ‘कमी-जास्त पत्रक’ (कजाप) तयार करून आकारबंद व गाव नकाशांमध्ये दुरुस्ती केली जाईल; तसेच नव्या सात-बारांमध्ये ‘भारत सरकार रेल्वे’ अशी नोंद करण्यात येईल. तिसऱ्या रकान्यात एकूण क्षेत्र आणि चौथ्या रकान्यात ‘पोट खराबा’ अशी नोंद केली जाणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षकांकडून ‘कजाप’ पत्रक तयार करून, त्याच्या आधारे तलाठ्यांकडून गाव नकाशे आणि आकारबंदामध्ये लाल शाईने नोंदी करण्यात येतील. त्यानंतर स्वतंत्र सात-बारावर रेल्वेच्या हक्काची नोंद केली जाईल.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा