गुणरत्न सदावर्ते हे बीड जिल्ह्यात काही कामानिमित्त आल्या असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला . यावेळी त्यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला. तसंच संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांना मंत्रीपद गमवावे लागलं होतं. जनतेच्या मताचा आदर करून त्यांना मंत्री केलं तर आनंद होईल असं वक्तव्य सदावर्तेंनी केलंय.