मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांना आता काडीचीही किंमत उरली नाहीये, असं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जालन्यातून टीकास्त्र डागलं. सदावर्ते यांनी जरांगे आणि मंत्री उदय सामंत यांच्या भेटीवर देखील शंका निर्माण केलीय. सामंतांच्या भेटीनंतरच मनोज जरांगेंनी आंदोलनाची घोषणा केली असल्याचं त्यांनी म्हटलं. उद्योगमंत्र्यांमुळे जरांगेंचे उद्योग सुरू झालेत, अशा शब्दांत सदावर्तेंनी टीका केली.