• Sun. Jun 7th, 2026
    Kalyan Dust Storm : तुफान आलंय! कल्याणमध्ये वादळी वाऱ्याचं थैमान, हवामानामुळे जनजीवन विस्कळीत

    Kalyan Dust Storm : कल्याणमध्ये वादळी वाऱ्याने प्रचंड थैमान घातले असून सर्वत्र धुळीचे लोट उसळले आहेत. अचानक आकाश काळवंडल्याने आणि सोसाट्याचा वारा सुटल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. या बदललेल्या हवामानामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

    कल्याण वादळ बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे (कल्याण) : निसर्गामध्ये अचानक झालेल्या बदलांमुळे दिवा, डोंबिवली, कल्याण, मलंगगड परिसर आणि ग्रामीण भागात चारच्या सुमारस धुळीचे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरावर पसरलेल्या या धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता ही मोठ्या प्रमाणात खालावल्याचं बोललं जात आहे. असेच धुळीचे वादळ मागच्या आणि त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा आलं होतं. उन्हाळ्यात असे वादळ येत असून हे तिसरं वर्ष आहे.

    सोसाट्याचा वारा अन् धुळीचं वादळ

    महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला होता. सद्या परिस्थिती पाहता हे सर्व खरं होताना दिसत आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागली असून कल्याण, डोंबिवली, दिवा आणि आसपासच्या ग्रामीण परिसरात आज सकाळपासूनच वातावरणात उकाडा होता. त्यातच आद दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे ठाणे जिल्हातील काही शहर आणि ग्रामीण परिसर काही काळ धुळीच्या चादरी आड झाकोळली गेली होती.
    Maharashtra TimesThane Water Cut: ठाण्यात 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद! मुंब्रा, दिवा, कळव्यामधील अनेक भागांना फटका; कधी होणार परिणाम?

    शहरातील हवेची गुणवत्ता खालावली

    जोरदार वाऱ्यांमुळे ठाणे जिल्ह्यातील काही शहरामध्ये रस्त्यांवर, इमारतींवर, झाडांवर साचलेली धूळ मोठ्या प्रमाणात हवेत उडाल्याने काही काळ दृश्यमानता कमी झाली होती आणि मोठ्या प्रमाणावर हे धुळीचे लोट उठले होते. दरम्यान, शहरावर पसरलेल्या या धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता ही मोठ्या प्रमाणात खालावल्याचं बोललं जात आहे. परिणामी श्वसन आजार असणाऱ्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास झालाय, तर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आणि बाईकवरून जाणाऱ्या प्रवाशांना ह्याचा त्रास झाला.
    Maharashtra TimesThane News: रस्त्याच्या मधोमध स्थानकं, 3000 झाडांची कत्तल! ठाणे रिंग मेट्रोमुळे कोंडी कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती

    कल्याणचा लोकग्रामचा रेल्वे पादचारी पूल ढसाढसा रडतोय

    कल्याणच्या लोकग्रामच्या पादचारी रेल्वे पूल 2018 साली रेल्वे प्रशासानकडून पाडण्यात आला होता. या रेल्वे पादचारी पुलाच्या जागेवर नवा पादचारी पूल होईल, अशी माहिती समोर आली होती. पण या रेल्वे पादचारी पुलाचं काम पूर्ण होण्यासाठी अजूनही सर्वसामान्य नागरिकांना वाट पाहावी लागत आहे. विशेष म्हणजे जवळपास सहा वर्षे हा रेल्वे पादचारी पूल अदृश्य होता. रेल्वे पादचारी पूल आज होईल, उद्या होईल, अशी आशा घेऊन लाखो नागरीक दररोज रेल्वे पूल जिथे जमीनदोस्त करण्यात आला होता त्या जागेवरुन रेल्वे रुळ पार करुन पायपीट करत जात होते. आतादेखील प्रवाशांची तीच अवस्था आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा