बारामतीकरांनी पोटनिवडणुकीत भरघोस मतदान करून सुनेत्रा पवारांना आमदार केलं. सुनेत्रा पवारांचा विजय होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते आणि अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवारांनी बारामतीकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी दर गुरुवारी जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. सांगितल्याप्रमाणे जय पवारांनी आज बारामती येथे नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी जनता दरबाराची सुरुवात केली. यानंतर जय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.