Pune Purandar Airport: गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या पॅकेज अंतर्गत भूसंपदान प्रक्रिया सुरू झालेली असताना पुंरदर विमानतळासाठी आणखी एक पॅकेज जाहीर केलं आहे. यामुळे मोबादल्यासह, एरोसिटीमध्ये भूखंड आणि परिवारातील एकाला नोकरी या सुविधांचा समावेश आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. 4 मे रोजी, सोमवारपासून सुरू झालेल्या या भूसंपादन प्रक्रियेत पहिल्याच दिवशी 450 एकर जमिनीचे करारनामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. या संपूर्ण भूसंपदन प्रक्रियेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जात आहे, म्हणजे First Come, First Serve तत्वावर ही प्रक्रिया राबवली जात आहे. तसेच, करारावर स्वाक्षरी झाली की लगेच पैसे मिळतील असे आश्वासन जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
नवीन पॅकेज जाहीर
याशिवाय 5 मे रोजी, मंगळवारी पुरंदर येथील विमानतळासाठी राज्य सरकारने आणखी एक ‘पॅकेज’ जाहीर केलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रति एकरी 1.61 कोटी रुपयांचा दर निश्चित झाला आहे. याशिवाय विमानतळाच्या शेजारी उभारण्यात येणाऱ्या AeroCityमध्ये 10 टक्के भूखंड शेतकऱ्यांना परत केला जाईल. याशिवाय विमानतळामुळे बाधित झालेल्या परिवारामधील एका सदस्याला नोकरी देण्यात येईल. पुण्याचे जिल्ह्याधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबद्दल माहिती दिली आहे.Pune Purandar Airport : पुरंदरचे शेतकरी होणार कोट्यधीश! ‘पॅकेज’ ठरले, लवकरच वाटप; विमानतळासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर किती मोबदला?
“पुरंदर येथील विमानतळाला शासन विशेष प्राधान्य देत असून जमीन मालकांसाठी विशेष पॅकेज ठरवण्यात आलं आहे. सरकार जरी प्रति एकरी 1.61 कोटी रुपये देत असेल तरी इतर सुविधांचा विचार करता शेतकऱ्यांना प्रति एकरी सुमारे 2 कोटींची नुकसान भरपाई नक्कीच मिळत आहे,” असे डुडी यावेळी म्हणाले. या जमीन संपादनाची औपचारिक प्रक्रिया 7 मेपासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि सासवड प्रभाग कार्यालयात सुरू होणार आहे. करारावर स्वाक्षरी करताच RTGSद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया 10 जूनपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.
पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील 7 गावांमधील सुमारे जमिनीची गरज आहे. विमानतळासाठी 1,216 हेक्टर आणि एरोसिटीसाठी 245 हेक्टर जागेची आवश्यकता आहे. राज्य सरकारने गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याचे दर निश्चित केले. त्यानंतर पहिलं पॅकेज ठरलं आणि 4 मेपासून प्रक्रियेला सुरूवात झाली. यापूर्वीच 7 गावांमधील 400हून अधिक कुटुंबियांनी मंजुरी देऊन आपल्या जमिनीचे कागदपत्रे सादर केले आहेत. 10 जून या मुदतीपूर्वी जे शेतकरी आपली जमिन ताब्या देतील त्यांना एरोसिटीमद्या 10 टक्के भूखंड मिळणार आहे. निर्धारित वेळेनंतर सरकार स्वतःहून जमिन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करेल आणि त्यावेळी शेतकऱ्यांना हा लाभ घेता येणार नाही.
Pune News: बोगद्यांतून पुणे ‘सुपरफास्ट’! शहरातील टेकड्यांमधून तयार करणार दोन मार्ग; 1 तासाचा प्रवास 15 मिनिटांत होणार
पुरंदर येथील विमानतळामुळे बाधित होणारी गावं
उदाचीवाडी येथील 58.34 हेक्टर जमीन, वनपुरी येथील 154.06 हेक्टर जमीन, कुंभारवळणातील 254.48 हेक्टर, खानवडी येथे 269.22 हेक्टर, मुंजवडी येथील 82.56 हेक्टर, एकहतपूरमधील 199.03 हेक्टर आणि पारगावातील 188.07 हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाईल.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा