• Sun. Jun 7th, 2026
    नागपूर सायबर पोलिस ठाण्यातील दोन पीआयसह 9 कर्मचारी निलंबित; 500 रुपयांचं प्रकरण भोवले, नक्की काय घडलं?

    Nagpur Cyber Police Suspension: ​या दोन्ही पथकांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये पैशाच्या वाटणीवरून वाद व्हायला लागले. बघता बघता पोलिस विभागात या प्रकरणाची चर्चा व्हायला लागली.

    सायबर ठाण्यात दोनी पीआयसह नऊ निलंबित(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ५०० रुपयांचा गुन्हा दाखल करून वसुली करण्याचा ठपका ठेवत सायबर पोलिस ठाण्यातील दोन पीआयसह नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

    उत्तर प्रभागाचे निरीक्षक बळीराम सुतार, दक्षिण प्रभागाचे निरीक्षक योगेश घारे, साहाय्यक पोलिस निरीक्षक विजय राणे, पोलिस शिपाई प्रफुल्ल ठाकरे, सतीश वाघ, श्रीकांत गोणेकर, सुशील चंगोले, अजय पवार व सौरभहिवरकर, अशी निलंबित केल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केलेल्या या निलंबनाच्या कारवाईमुळे पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

    प्राप्त माहितीनुसार, दीड महिन्यांपूर्वी सायबर पोलिसांनी ऑनलाइन क्रिकेट सट्ट्यात ५०० रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यात पुण्यातील सट्टेबाज जैन याचे नाव नव्हते. परंतु, त्याच्याकडून वसुलीसाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर साय पोलिसांचे पथक पथक पुण्याला गेले. खराडी येथील जैनच्या कार्यालयावर छापामार कारवाई केली.

    Maharashtra TimesBacchu Kadu: पंधरा दिवसांत GR काढा! शेतकरी कर्जमाफीबाबत शिवसेना नेते बच्चू कडू यांची सरकारकडं मागणी
    अटक न करण्यासाठी या पथकाने जैन याच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली. याच गुन्ह्याच्या तपासासाठी दुसरे पथक मुंबईला गेले. कारवाई न करताच या पथकाला परत बोलावण्यात आले. मुंबई व पुण्यात जाण्यासाठी दोन्ही पथकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही अथवा स्टेशन डायरीतही तशी नोंद केली नाही. दोन्ही पथके नागपुरात परतल्यानंतर वसुलीची बाब समोर आली.

    वाटण्यांचा वाद अन् साराच बोभाटा !
    एपीआय राणे यांनी शिपाई प्रफुल्ल ठाकरे यांच्यावर माहिती उघड केल्याचा आरोप केला. ठाकरे यांना मारहाण केली. त्यामुळे ठाकरे दोन दिवस शहरातून गायब झाले. अचानक ठाकरे बेपत्ता झाल्याने हे वसुलीचे संपूर्ण प्रकरणच बाहेर आले. पोलिस आयुक्तांनी पोलिस उपायुक्त नित्यानंद झा यांना चौकशीचे आदेश दिले. चौकशीत घारे, राणेंसह नऊ जण दोषी असल्याचे आढळले. त्यानंतर आयुक्तांनी त्यांना निलंबित केले. या नऊ जणांव्यतिरिक्तही काही वसुली- वसुलीबाज सायबरमध्ये असल्याची चर्चाही या निमित्ताने विभागात सुरू झाली आहे.

    Maharashtra TimesCensus In Maharashtra: घरच्यांना घेऊन जा जनगणनेला! प्रशासनातील अधिकाऱ्यांचे उफराटे सल्ले, शिक्षिकांना घरोघरी एकटे फिरण्याची भीती
    दीपक अग्रवाल नवे उपायुक्त
    पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी मंगळवारी तडकाफडकी सायबरच्या उपायुक्तपदी पोलिस मुख्यालयाचे उपायुक्त दीपक अग्रवाल यांची नियुक्ती केली. ५०० रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करून वसुली प्रकरणाने सायबर विभाग चांगलाच चर्चेत आला. आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर मंगळवारी अग्रवाल यांच्याकडे सायबरचा अतिरिक्त कारभार सोपविला. आधी उत्तर सायबरचे ऋषिकेश रेड्डी तर दक्षिण सायबरचे लोहित मतानी हे उपायुक्त होते. आता अग्रवालच सायबरचे उपायुक्त असतील.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा