• Sun. Jun 14th, 2026
    Mumbai Water Cut: मुंबईत 30 तास पाणीपुरवठा बंद! 5 ते 6 मे रोजी सहा वॉर्डमध्ये परिणाम; कुर्ला, घाटकोपर, परळसह अनेक ठिकाणी फटका

    Mumbai Water Supply Cut: मुंबईतील 6 वॉर्डमध्ये तब्बल 30 तासांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. महापालिकेने याबद्दल माहिती दिली असून कोणत्या भागांवर परिणाम होणार याची संपूर्ण यादीही जाहीर केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबईकरांवर ऐन उन्हाळ्यात जलसंकट ओढवलं आहे. अनेक भागांत तब्बल 30 तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडणार आहे. महापालिकेने वडाळ्यातील अमर महाल ते प्रतीक्षा नगर नवीन जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू केलं आहे. त्यामुळे 5 ते 6 मे रोजी, म्हणजे पुढच्या मंगळवारी आणि बुधवारी काही प्रभांगमध्ये 30 तास पाणीकपात केलं जाणार आहे.

    कोणत्या वॉर्डवर परिणाम?

    मुंबई उत्तरेत माटुंगा, शीव, वडाळा, दक्षिण भागांत परळ, शिवडी, एल वॉर्डमध्ये कुर्ला, साकीनाका, पूर्व भागात गोवंडी, मानखुर्द, पश्चिमेत चेंबूर आणि एन वॉर्डमध्ये घाटकोपरव, विक्रोळी, आणि विद्याविहार या भागांमध्ये 30 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 5 मे, मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून ते 6 मे, बुधवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

    Maharashtra TimesMumbai News: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, दहिसर-भाईंदर एलिव्हेटेड रोडमुळे प्रवास सुस्साट! मुंबईतील कोंडी फोडणारे मार्ग कधी सुरू होणार?

    बोगद्याच्या कामासाठी पुरवठा बंद

    मुंबई महापालिकेने वडाळ्यातील अमर महल ते प्रतीक्षा नगरपर्यंत एका नवीन बोगद्याचं काम हाती घेतलं आहे. हा नवा बोगदा परळ, ट्रॉम्बे जलाशयाला जोडणार आहे. पुढे जाऊन तुर्भेतील उच्च स्तरीय जलाशयापर्यंत या बोगद्याचा विस्तार करण्यात येणार आहे. यामध्ये 1,800 मीमी व्यासाच्या बोगद्यासह इतर संबंधित कामे केली जाणार आहेत. या बोगद्याचं बांधकाम सुलभ करण्यासाठी तुर्भे येथील उच्च-स्तरीय आणि निम्न-स्तरीय जलाशयांमधील पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात येणार आहे. या 30 तासांच्या कालावधीत हे काम संपवून पाणी पुरवठा पूर्ववत केला जाईल. त्यामुळे या काळात रहिवाशांनी पुरेसे पाणी साठवून ठेवून पाण्याचा कमीत कमी वापर करण्याचा सल्ला महापालिकेने दिला आहे.

    कोणत्या विभागांमध्ये पुरवठा बंद राहील?

    एफ/उत्तर वॉर्ड: प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, संजय गांधी नगर, शांती नगर, एच.एम. रोड, के. डी. गायकवाड नगर, वडाळा ट्रक टर्मिनस, न्यू कफ परेड, अल्मेडा कॉम्प्लेक्स, शीव पूर्व आणि पश्चिम.

    एफ/दक्षिण वॉर्ड: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, दिनशॉ पेटीट मार्ग, परमार गुरुजी मार्ग, गोखले मार्ग, दादासाहेब फाळके मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, जेरबाई वाडिया मार्ग, बीजे देवरुखकर मार्ग, सेंट पॉल मार्ग, सेंट झेवियर मार्ग, खाशाबा मार्ग, महादेव पालव मार्ग, जिजीभॉय लेन, आचार्य दोंदे मार्ग, विठ्ठल चव्हाण मार्ग, जगन्नाथ भटंकर मार्ग, बाटलीवाला गल्ली, शिरोडकर मार्ग, चिवडा गल्ली, साने गुरुजी मार्ग, आनंद मालवणकर मार्ग, गॅस कंपनी गल्ली.

    Maharashtra TimesThane News: मुंबई, ठाणे ते समृद्धी महामार्ग वेगवान प्रवास शक्य! 21 किमी लांब उन्नत मार्गामुळे प्रवाशांना फायदा; कुठे असेल मार्ग?

    एल वॉर्ड: साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांतीनगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, न्यू टिळक नगर, कुरेशी नगर, हिल मार्ग, ताडी पेठ, मुक्तादेवी मार्ग, गावदेवी मंडळ, पंचशील नगर, नेहरू नगर, शिव सृष्टी मार्ग, नाईक नगर, मदर डेअरी मार्ग, एस. जी. बर्वे मार्ग, कुर्ला पूर्व केदारनाथ मंदिर रोड, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलिस कॉलनी, कुर्ला कारशेड, रेल्वे कॉलनी, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, राहुल नगर, एव्हरार्ड नगर, पान बाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अली दादा स्ट्रीट, स्वदेशी मिल चाळ, चुनाभट्टी फाटक, म्हाडा कॉलनी, समर्थ नगर.

    यासह महापालिकेच्या एम/पूर्व वॉर्ड आणि एम/पश्चिम वॉर्डातील पुरवठाही विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा