कायदा हातात घेऊन शक्तीपीठाचा अट्टाहास मोडून काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला नको असलेला शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा आपला ड्रिम प्रोजेक्ट म्हणून लादू पाहतायत, देवस्थानाच्या नावाखाली हा रस्ता होतोय, पण त्या देवस्थानांना आधीच रस्ता आहे, त्यामुळे या रस्त्याची आवश्यकता नाही, असे देखील माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीच्या ईश्वरपूर येथे पार पडलेल्या शक्तीपीठ विरोधी जन आक्रोश मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.