Pune Santosh Jagdale Family on Pahalgam Attack : वर्षभरात खूप काही घडलं, पण आमच्या जखमा अजून ओल्या आहेत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या आसावरी जगदाळे आणि त्यांची आई प्रगती जगदाळे यांनी मांडलेली ही कैफियत खूप काही सांगून गेली.
सगळं सुरळीत सुरु असताना दुःखाचा डोंगर
पुण्यातील आसावरी जगदाळे या त्यांचे वडील संतोष आणि आई प्रगती यांच्यासमवेत गेल्या वर्षी उन्हाळी सुट्ट्यांसाठी काश्मीरमध्ये पर्यटनाला गेल्या होत्या. सगळे काही सुरळीत होते. बैसरण व्हॅलीमध्ये इतर पर्यटकांबरोबरच जगदाळे कुटुंबही निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यात मग्न होते. त्या वेळी झालेल्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी संतोष जगदाळे यांच्यावर केलेल्या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सगळा प्रकार एवढा अनपेक्षित होता की आसावरी आणि त्यांच्या आईला मोठा धक्का बसला. वडील सोडून गेल्याचे दुःख तर होते; पण त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यापासून ते घराची आर्थिक बाजू सांभाळण्यापर्यंत जबाबदारी आसावरी यांच्यावर आली.
मानसिक-आर्थिक अडचणींचा सामना
वर्षभरातील घडामोडीचा पट उलडताना आसावरी जगदाळे म्हणाल्या, वर्षभरात आम्ही मायलेकींनी मानसिक, शारीरिक, आर्थिक अशा अनेक अडचणींचा सामना केला. अनेकदा आजारी पडलो, हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. सरकारने मला दिलेले नोकरीचे आश्वासन आणि आर्थिक मदत मिळविण्यासाठी खूप पाठपुरावा करावा लागला. अनेकांशी संपर्क साधल्यानंतर आर्थिक मदत उपलब्ध झाली. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला. नोकरीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दोन मिनिटे बोलायचे होते; पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्गच कोणी सांगत नव्हते. अखेर खासदार मेधा कुलकर्णी यांनी आम्हाला न्याय मिळवून दिला. आमच्या मागण्यांचे पत्र त्यांनी दिल्लीत गेल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचवले.
Amravati Crime : अयानचा निर्लज्जपणा, पैशांसाठी कुटुंबालाही सोडलं नाही, आईच्या स्त्रीधनालाच हात घातला
समाजमाध्यमांद्वारे आमच्या प्रलंबित मागण्यावर त्यांनी भाष्य केले. मेधाताईंच्या पाठपुराव्यामुळे महिनाभरात आमचे काम झाले. सरकारने मला मार्च महिन्यात महापालिकेमध्ये नोकरी दिल्याचे पत्र दिले. नोकरीचा आनंद आहे; पण वडील नाहीत, याचं दुःखही तेवढंच मोठं आहे. आई अजून धक्क्यातून सावरलेली नाही. तिला पुढे घेऊन जायचे आहे. नवीन काही शिकत नव्याने आयुष्य जगण्याचा प्रयत्न मी आता करणार आहे…असा आशावादही आसावरी यांनी व्यक्त केला.
Pahalgam Attack | हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, अजूनही भयानक आठवणी ताज्या, आजही डोळे पाणावतात
दहशवादी आल्याची स्वप्ने
गेल्या वर्षभरात आम्ही दोघी एकही रात्र सलग आठ तास झोपू शकलो नाही. कानात लोकांच्या किंकाळ्या आणि रडण्याचे आवाज गुंजतात. पहलगाममध्ये फिरत आहोत, दहशतवादी अचानक समोर आले आहेत, बेछूट गोळीबार करीत आहेत. कधी ते आमच्या घरात शिरले आहेत, आमचा पाठलाग करीत आहेत… अशी धडकी भरवणारी स्वप्न रोज पडतात. यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही समुपदेशन घेतले; पण मनातील भीती कायम आहे. तो वेदनादायी प्रसंग शब्दांत मांडणे कठीण आहे, असे सांगताना आसावरी आणि प्रगती जगदाळे भावूक झाल्या.
Crime News : मसाल्यातून विष, सासूचा मृत्यू; डॉक्टरांना कॉलेजमधले धडे आठवले, नववधूच्या नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
उरलेले आयुष्य देश आणि धर्मासाठी
‘दहशतवाद्यांनी पर्यटकांना मारण्यापूर्वी त्यांची धार्मिक ओळख विचारली होती. माझ्या पतीला धर्म विचारल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. त्या क्षणाचा विचार केला की मनात येते, मी तेव्हा काही करू शकले असते का? मी त्यांची बंदूक हिसकावून घेतली असती किंवा त्यांच्याशी लढून पतीला वाचवले असते का? हे विचार मला रोज छळतात. देवाने मला जिवंत ठेवले आहे, यामागे नक्कीच काही तरी कारण असावे. त्या घटनेने आम्हाला खूप काही शिकवले आहे. मी आणि माझ्या मुलीने आता उरलेले आयुष्य देश आणि धर्मासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे प्रगती जगदाळे यांनी सांगितले.
