Devendra Fadnavis On Women Reservation: महिला आरक्षणाबरोबरच मतदारसंघ पुनर्रचना, जातनिहाय गणना आणि महायुतीच्या पुढील आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भाष्य केले.
‘२०२३मध्ये महिला आरक्षणाचे विधेयक संमत झाले, तेव्हा जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना पूर्ण करून हे विधेयक लागू करण्याबाबात सुधारणा झाली होती. त्यामुळे आता आलेले विधेयक हे अचानक आलेले नाही. कोविडमुळे जनगणना लांबली. मागचा अनुभव लक्षात घेता जनगणना, मतदारसंघ पुर्नरचना यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता महिला आरक्षण लागू करणे लांबणीवर जाण्याची शक्यता होती. त्यामुळे संसदेने २०२३ ला घेतलेल्या निर्णयाप्रमाणे, २०११ च्या जनगणनेनुसार मतदारसंघ फेररचना करून कोणत्याही स्थितीत २०२९ ला महिला आरक्षण विधेयक लागू करावे आणि २०२९ ला सर्वाधिक संख्येने संसदेत महिला निवडून येतील, अशा शुद्ध भावनेने याची होती.
Fadnavis VS Sule | महिला विधेयकावरून फडणवीसांचं ओपन चॅलेंज सुळेंनी स्विकारलं, नेमकं काय घडलं?
एनडीएजवळ दोनतृतीयांश बहुमत असते तर एकमताने हे विधेयक मंजूर झाले असते. कोणी विरोध केला नसता. संख्याबळ नसल्याचे लक्षात आल्याने विरोधकांना ही संधी दिसली पण चुकीच्या ठिकाणी संधी शोधली’, असे ते म्हणाले. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अदिती तटकरे, खासदार ज्योती वाघमारे, महापौर रितू तावडे आदी उपस्थित होते.‘राहुल गांधी खोटारडेपणात विजेते’
‘एखादी व्यक्ती किती खोटे बोलू शकते, याच्या ऑलिंपिक स्पर्धा झाल्या तर त्याचे सुवर्णपदक काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मिळेल. हे विधेयक घटनेने दिलेल्या संकेतांनुसारच होते. राहुल यांनी विरोध करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी प्रतारणा केली. त्यांनी दंडवत घालून महिलांची माफी मागितली पाहिजे’, असेही त्यांनी नमूद केले. ‘काँग्रेसची मानसिकता अर्बन नक्षल झाली आहे. सातत्याने त्यांनी महिला विरोधी धोरणे घेतली. शाहबानो प्रकरणात तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल घटना संशोधन करून बदलणारा हा काँग्रेस पक्ष आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Mumbai Drugs Seized: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! टिटवाळ्यात तब्बल 6 कोटींचे ड्रग्ज जप्त; महिला सप्लायर अटकेत
‘प्रियांका गांधींचा दोष नाही’
‘काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या नव्या आहेत. त्यांचा पुरेसा अभ्यास नसेल. २०२३ला मंजूर केलेल्या विधेयकामुळे मतदारसंघ फेररचना आणि जनणगणनेशिवाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही, हे कदाचित त्यांना त्यांच्या लोकांनी सांगितले नसेल’, म्हणून त्यांनी असा आरोप केला. मी त्यांना दोष देत नाही, असेही ते म्हणाले.
