• Tue. Aug 18th, 2026

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’ असून एक महाराष्ट्रात, तर दोन केंद्रात आहेत, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.

सोमवारी (दि. १७) माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी विविध राजकीय मुद्द्यांवरून भाजपला लक्ष्य केले. अमित शहा माफी मागा म्हणतात , हेच इडियटपणाचे लक्षण आहे. संसदेतून पळून गेले, ते इडियट नाहीत का? देशात रोज पेपर फुटत आहेत. मंत्री इकडे-तिकडे फिरत आहेत. मग कुणाला इडियट म्हणायचे?, असा सवाल राऊत यांनी केला.

‘इडियट’ हा असंसदीय शब्द नसल्याचे स्पष्ट करत राऊत यांनी आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाचा दाखला दिला. या देशात ‘थ्री इडियट्स’ नावाचा चित्रपट आला. त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. स्वतः पंतप्रधानांनीही हा चित्रपट पाहण्यास सांगितले होते. त्यामुळे भारतीय राजकारणातील ‘थ्री इडियट्स’ कोण आहेत, हे सर्वांना माहीत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

Nashik Crime : नुकताच जामिनावर बाहेर आला, टपरीजवळ उभा असताना जीवघेणा हल्ला; कुख्यात गुंड सुमित पगारेला दिवसाढवळ्या संपवलंराऊतांच्या जीभेला हाड नाही : पालकमंत्री गिरीश महाजन

संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही , त्यामुळे ते जे काही बोलतात ते बोलू द्या, त्याने काहीही फरक पडत नाही, असे प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी राऊतांच्या आरोपांवर दिले. पंतप्रधान, न्यायालय, निवडणूक आयोग कुणालाही हे सोडत नाहीत. त्यांच्याकडे आज फक्त दोन खासदार उरले आहेत. ते कोणाविरोधात काय बोलतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे . पुढील काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्याचा दाखला देत महाजन यांनी राऊत यांना थेट आव्हान दिले. ठाकरे गटाचा एक तरी जिल्हा परिषद अध्यक्ष करून दाखवा . कारण नसताना बडबड करण्यात अर्थ नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकच्या खड्ड्यांवरून संजय राऊत आक्रमक; भाजप आमदारांच्या घरासमोर आंदोलन करणार

‘शरद पवार आघाडीसोबतच’

मोदी, शहा आणि फडणवीसांवर हल्लाबोल करताना राऊतांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुन्हा बाजू घेतली. पवाराच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चेलाही राऊत यांनी पूर्णविराम देत, शरद पवार कुठेही जाणार नाहीत. ते आमच्यासोबतच राहतील. शरद पवार हे इंडिया ब्लॉक आणि आघाडीचे नेते असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपकडून त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे. ‘आपण जोमाने लढू आणि जिंकू’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed