यवतमाळ येथील धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. नाशिकमध्ये अशोक खरात, एका आयटी कंपनीतील महिलांच्या अत्याचाराचे प्रकरण ताजी असतानाच आता यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलींची मानवी तस्करी केली जात असल्याचा दावा केला जात आहे. यवतमाळचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी संबंधित प्रकरणाचा दावा केला आहे. या प्रकरणी एक कथित ऑडिओ क्लिपदेखील समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संबंधित कथित रॅकेट कसं चालतं, याबाबतचा उलगडा होताना दिसत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
यवतमाळ : यवतमाळमधून धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात 6 महिन्यात तब्बल 34 मुली बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या गायब झालेल्या मुलींची मानवी तस्करी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. आदिवासी मुलींच्या पालकांना पैशांचे आमिष दाखवून फूस लावली जाते, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केला आहे. या प्रकरणात लव्ह जिहाद, धर्मांतर असा अँगलही असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी प्रफुल्ल चव्हाण यांनी केली आहे. या प्रकरणातील आरोपी हा राळेगावमधील असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एक मुलगी आणि तिच्या प्रियकराची एक कथित ऑडियो क्लिप समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमधील संभाषण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण या ऑडिओ क्लिपची ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ पुष्टी करत नाही.
प्रफुल्ल चव्हाण नेमकं काय म्हणाले?
“छोट्या-छोट्या मुलींची मानव तस्करी करणं, त्यांचं जबरीने लग्न लावून देणं हे अतिशय गंभीर बाब आहे. चार-पाच दिवसांपूर्वी आमच्या हाती एक ऑडिओ क्लिप लागली. ती ऑडिओ क्लिप ही एक महिला जी त्या सिंडिकेटचा पार्ट आहे, तिची मुलगी आणि तिचा प्रियकर याच्यातील संभाषणाची ती ऑडिओ क्लिप आहे. ती ऑडिओ क्पिल अतिशय गंभीर आहे. त्यातला संवाद मन हेलावून टाकणारा आहे. आम्ही रातोरात एका मुलीला यातून वाचवलं. आम्ही ती ऑडिओ क्लिप पोलीस प्रशासनाला दिली आहे. या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून तपास केला तर खूप मोठं रॅकेट समोर येईल”, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल चव्हाण यांनी दिली. “एक ऑडिओ क्लिप आमच्या हाती लागली. त्यातला संवाद खूप गंभीर आहे. कशापद्धतीने या परिसरातील गरीब मुलींना आमिष दाखवून, पैशांचे आमिष दाखवून त्यांची मानव तस्करी करणे, 15 वर्षाच्या मुलीला 45 ते 50 वर्षाच्या पुरुषासोबत विकणे, त्यांचे खोटे लग्न करुन देणे, तिचं पुढे मानवी तस्करी करणे, असं आहे. यामध्ये लव्ह जिहादचा अँगल आहे. कारण ऑडिओ क्लिप समोर आली आहे. त्यानुसार मजहर कुरेशी आणि त्याची पत्नी हे सिंडिकेट चालवत आहेत. या माध्यमातून हिंदू मुलींचे धर्मांतरण करणे आणि त्यांना पुढे वेश्या व्यवसायात ढकलणे अशीही शंका उपस्थित होत आहे”, असा आरोप प्रफुल्ल चव्हाण यांनी केला आहे.
प्रफुल्ल चव्हाण यांचे पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप
“या प्रकरणातील मुख्य आरोपी मजहर कुरैशी याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. दुर्दैवाने एका पोलीस अधिकाऱ्याने त्याला सोडण्याचं महापाप केलं. तो लगेच तेलंगणात पळून जात होता. पण त्यावेळी त्याला पुन्हा अटक करण्यात आली. पण पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी अशा आरोपींना सहकार्य करत असतील तर शंभर टक्के ही गंभीर बाब आहे. या प्रकरणी आम्ही त्या पोलीस कर्मचाऱ्याची तक्रार केली आहे. शंभर टक्के त्याच्यावर निलंबनाची कारवाई करणार असल्याची माहिती वरिष्ठांनी दिली आहे”, अशी देखील प्रतिक्रिया प्रफुल्ल चव्हाण यांनी दिली आहे.
आदिवासी विकासमंत्र्यांकडून प्रफुल्ल चव्हाणांच्या आरोपांची दखल
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्या आरोपांची दखल आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी दखल घेतली. त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांची तातडीने भेट घेतली. त्यांनी या प्रकरणात सखोल तपासाची सूचना दिली. या प्रकरणात जातीने लक्ष घाला आणि वेगाने तपास करा, अशा सूचना उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आहे.
कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषण नेमकं काय?
मुलगा : काय म्हणता?
मुलगी : पोरीचं काम घेऊन चालले म्हणतो तो पुण्याले…
मुलगा : अच्छा… अच्छा! एकटीच आहेस?
मुलगी : एकटी नाही तर काय दहा जण नेणार का शुभम मामा?
मुलगा : शुभम मामा कोण?
मुलगी : पोरी काढणारा.
मुलगा : अच्छा, कुठला आहे?
मुलगी : आपल्याच गावाचा आहे, फुकटनगरमध्ये राहतो.
मुलगा : कल्याणी आत्या करते वाटतं ना ते काम?
मुलगी : हो
मुलगा : तिने सोडलं का?
मुलगी : नाही.
मुलगा : पण ती आपल्याच गावात दिसते घराजवळ.
मुलगी : मोबाईलवर कामं करत असते.
मुलगा : अच्छा, असं आहे का?
मुलगी : तिला या कामासाठी जेल झाली होती. तेव्हापासून मोबाईलवर काम करते. कुठे जात नाही. तिचं नील झालं की जाईल आता.
मुलगा : तिचा नवरा?
मुलगी : बाबा, कल्याणी आत्याचंही लग्न करुन दिलं होतं. कल्याणी आत्या निघाली होती ना…
मुलगा : मजहर कुरेशी
मुलगी : हो त्यानेच करुन दिलं होतं. खतरनाक काम आहे.
मुलगा : तू सुद्धा तसे काम करते का?
मुलगी : कोण?
मुलगा : मजहर कुरेशी?
मुलगी : नाही… हो, ते कुरेशी करते काम.
मुलगा : मला वाटले नव्हते.
मुलगी : पैसा किती भेटते. पण बद्दूवा लयी लागते.
मुलगा : तुले काय वाटतं, चांगलं काम आहे?
मुलगी : मले चांगलं नाही वाटत. पण सांगत आहे. पैसा भेटते पण बद्दूवा लयी लागते.
मुलगा : अच्छा. तुम्ही तिघे-चौघेच आहेत का पोरी विकते आणि काढते.
मुलगी : बापरे! फक्त तिघे-चौघे? रॅकेट आहे.
मुलगा : बापरे!
मुलगी : आता पूनम आत्या आहे. किती जण आहे सांगू शकत नाही.
मुलगा : मेन कोण आहे मग?
मुलगी : यात मेन कोणीच नाही. सर्वच जण मेन आहेत काम लावणारे.
मुलगा : अच्छा!
मुलगी : आता समजा माझ्या आईची पोरगी.. पूनम आत्याने, कल्याणी आत्याने काम लावलं. मग त्यांना घेऊन जावं लागते. त्यांचं आधारकार्ड बनवावं लागतं. नकली आधारकार्ड. मग मीच आहे तिथे. ही इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगत आहे.
मुलगा : सांगना मग…
मुलगी : मी चालली पुण्याले..
मुलगा : अच्छा!
आदिवासी विकासमंत्री अशोक उईके काय म्हणाले?
“या प्रकरणात तपास सुरु आहे. पोलीस डिपार्टमेंटचं पूर्ण लक्ष आहे. कारवाई सुरु आहे. पोलिसांनी बऱ्याच लोकांना पोलीस ठाण्यात आणलं आहे. गुन्हा दाखल झाला आहे. कुरैशी म्हणून एक कार्यकर्ता आहे. त्याने अनियमितता केल्याचं विभागाच्या निदर्शनास आलं आहे. पोलीस शंभर टक्के त्यांच्यावर कारवाई करणार. दहा-बारा जणांची चौकशी झालेली आहे. अमन कुरैशी नावाच्या व्यक्तीला अटक झालेली आहे. या प्रकरणातील पीडितेंचा निश्चित आकडा सांगता येणार नाही. पूर्ण चौकशीनंतर सविस्तर माहिती देता येईल”, अशी प्रतिक्रिया आदिवासी विकासमंत्री अखोस उईके यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा