Yavatmal Crime News : पतीचा स्वभाव हा संशयी असल्याने या आधीही दोघांमध्ये वाद होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता तर त्याने घातलेल्या वादामुळे पत्नीने जीवन संपवल्याची घटना घडली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक चेतना मनोज जाधव (वय ३०) ही बोरगाव येथे पतीसह राहत होती. घटनेच्या दिवशी तिचा पती मनोज नामदेव जाधव याने बाजारातून मटण आणलं होतं. चेतनाने मटणाची भाजी बनवली, मात्र भाजी कच्ची राहिल्याच्या कारणावरून मनोजने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यातून निर्माण झालेल्या रागाच्या भरात चेतनाने घरात असलेलं विष प्राशन केलं. विष प्यायल्यानंतर चेतनाने स्वतः ही माहिती कुटुंबीयांना दिली. घाबरलेल्या नातेवाईकांनी तिला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, विष शरीरात भिनल्याने तिची प्रकृती खालावली होती. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले.
Pune Crime : नवऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, बायकोनं विवाहितेला निर्घृणपणे संपवलं; पतीने CCTV चेक करताच मोठं दृश्य समोर
दरम्यान, याप्रकरणी मृत चेतनाचे मामा मनोहर गणू राठोड यांनी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती मनोज नामदेव जाधव याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आर्णी ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पल्लवी निंनगुरकर, सुजित जाधव, प्रदिप खडके व अतुल पवार या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. संसारातील छोट्या-छोट्या कुरबुरींचे रूपांतर कधी अशा भीषण दुर्घटनेत होईल याचा नेम उरला नाही. या घटनेमुळे एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा अंत झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
Nagpur Accident : जेवण करुन परतताना काळाची झडप, भीषण अपघातात दोघांचा जागीच अंत; रात्रभर पार्थिव रस्त्यावरच पडलेले
‘पुन्हा सुखाने संसार करू’
मनोज हा दारूच्या आहारी गेला होता. यापूर्वीही २०१५ मध्ये त्याच्यावर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला होता. २०१७ मध्ये ‘पुन्हा सुखाने संसार करू’ या अटीवर चेतनाने त्याला माफ केले होते. मात्र, बुधवारी झालेल्या अपमानाचा घाव चेतना हिच्या मनाला इतका खोल लागला की, तिने टोकाचे पाऊल उचलले. भरल्या ताटावरून उठून ती आत गेली आणि तिने विषारी औषध प्राशन केले. बाहेर येऊन जेव्हा तिने पतीला ही बाब सांगितली, तेव्हा एकच खळबळ उडाली. ही घटना घडल्यानंतर चेतनाला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
