एक लाख खरात एकत्र केले तर एक अकबर होईल असं विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलंय. नांदेडमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय. यावेळी शरद पोंक्षे यांनी मुगल ए आजम, जोधा अकबर, बाजीराव मस्तानी सारख्या चित्रपटावर टीका केली. चित्रपटात खरा इतिहास लपवण्यात आला आणि अकबर कसा सेक्यूलर होता हे दाखवण्यात आलं, असं पोंक्षेंनी म्हटलंय.