• Sun. Jun 14th, 2026
    Nishikant Dubey यांचं लोकसभेत आदित्य ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य, अरविंद सावंत आणि सप्रिया सुळे संतापल्या

    लोकसभेत निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला. पण त्यांनी जे वक्तव्य केलं त्यावरुन खासदार अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे या प्रचंड संतापल्या. त्यांनी निशिकांत दुबे यांच्यावर कारवाईची मागणी केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नवी दिल्ली / मुंबई : महिला आरक्षण आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेचं विधेयक मंजूर करण्याच्या दृष्टीने संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. या अधिवेशनात दोन्ही विधेयकांवर लोकसभेत चर्चा होत आहे. या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांचं भाषण सुरु असतानाच खासदार निशिकांत दुबे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला. यावरुन अरविंद सावंत आणि खासदार सुप्रिया सुळे या प्रचंड संतापल्या. संबंधित वक्तव्याप्रकरणी निशिकांत दुबे यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

    अरविंद सावंत काय म्हणाले?

    “छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात झाशीची राणी लक्ष्मीबाईचा जन्म झाला. आता झाशी उत्तर प्रदेशात आहे. त्यावेळी बलवंतनगर होतं. मराठ्यांचं साम्राज्य होतं. झाशीची राणी मराठा होती. मराठी होत्या. अहिल्याबाई होळकर, ताराराणी महाराष्ट्राच्या होत्या. हा सर्व महाराष्ट्राचा इतिहास आहे. या पराक्रमी महिलांचा महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्रात 1279 मध्ये संत ज्ञानेश्वर यांची बहीण मुक्ताबाई यांनी चांगदेवाचं गर्वहरण केलं होतं. त्याला उपदेश दिला. हा आमचा महाराष्ट्र आहे.””जनाबाई आमच्या संत होत्या. परभणीच्या होत्या आणि मातंग समाजाच्या होत्या. कान्होपात्रा एक नर्तकीची कन्या होती जिने आयुष्यभर पाडुरंगाची सेवा केली. त्यांनी जे अभंग लिहिले, हा महाराष्ट्र आहे. या लोकांसाठी मी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या दोन ओळी बोलतो. अरे माणसा माणसा, कधीं व्हशीन माणूस, लोभासाठी झाला माणसाचा रे कानूस. लोभ काय आहे तर स्वार्थ आहे. या स्वार्थासाठी तुम्ही हे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. तुम्हाला हे विशेष अधिवेशन आता बोलवण्याची काय आवश्यकता होती?”

    “आम्ही महिला आरक्षणाला विरोध केला का? 2023 मध्ये देखील मी बोललो होतो. महिलांच्या समर्थनार्थ सर्व विरोधी पक्ष उभा होता. तुम्ही विसरलात का? महाराष्ट्रात महिलांना शिक्षण देण्याची सुरुवात सावित्रिबाई फुले यांच्यापासून झाली. महिलांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केली. त्यांना त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आनंदी जोशी देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत आणि त्या महाराष्ट्राच्या आहेत. पंडिता रमाबाई मराठी होत्या. चित्रपटसृष्टीतील पहिली महिला दुर्गाबाई कामत महाराष्ट्राच्या होत्या.”

    ‘तुमचे डिलिमिटेशन बिल हे राजकारणासाठी’, सावंतांची टीका

    “मला समजत नाही की इतके लोक बदलतात. पाच राज्यात निवडणूक सुरु असताना तुम्ही विशेष अधिवेशन बोलावलं. आता जरी विधेयक मंजूर झालं तरी ते 2029 मध्ये अंमलात येईल. मग 2027 मध्ये अधिवेशनाचं सत्र झालं असतं ना? या विधेयकाला कुणी विरोध केला होता का? तुमचं भाषण राजकीय आहे. पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू येथे महिला आरक्षणाचा ढोल वाजवायचा आहे. आम्ही महिला आरक्षणाच्या विधेयकाला तुम्ही डिलिमिटेशन बिल सोबत जोडलं आहे. त्यामुळे त्याला विरोध होत आहे. महिला आरक्षणाचं बिल आताच मंजूर करतो. डिलिमिटेशन बिल सोडा ना. तुमचे डिलिमिटेशन बिल हे राजकीय आहे”, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

    ‘शिवसेनेने महिलांना महापौर केलं’

    “आमच्या इतके मुंबई महापालिकेत आमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महिला महापौर बनल्या. किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, आंबेकर, भरपूर महिला आहेत. विशेष म्हणजे ज्यावेळी महिला आरक्षण नव्हतं, खुला प्रवर्ग होता त्यावेळी शिवसेनेने महिलांना मुंबईचा महापौर बनवलं. हा आम्ही महिलांचा सन्मान करतो”, असं अरविंद सावंत म्हणाले.

    ‘तुमच्या ढोंगच्या विरोधात आम्ही लढतो’

    “आपण मणिपूर कसं विसरतो? आपल्या मनात महिलांबद्दल इतका आदर आहे तर आज पुन्हा मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार सुरु झाले आहेत. हल्ले सुरु आहेत. निर्भया आम्ही विसरलो नाहीत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला बोलावलं नाही. प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मदिनीदेखील नाही बोलावलं. तरीही जय श्रीराम. ढोंग आहे. या ढोंगच्या विरोधात आम्ही लढतो. तुम्ही सांगता काय आणि करता काय, याच्यात फरक आहे”, अशीदेखील टीका त्यांनी केली.

    “महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहे. आमच्या महाराष्ट्राला कलंकीत केलं जात आहे. हे बिल आणलं तेव्हा मनात एकच गोष्ट येतो की, हे विधेयक आताच का मंजूर करायचं आहे? जून-जुलै महिन्यात मंजूर केलं जाऊ शकत नव्हतं? निवडणुकीच्या वेळी का? कारण तुम्हाला माहिती होतं की, निवडणुकीच्या काळात अनेक विरोधी पक्षाचे खासदार हजर राहू शकणार नाहीत. गैरहजर राहिले तर आपल्याला बिल पास करायला सोपं होईल”, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला.

    सावंत यांच्याकडून महाराष्ट्रातील मंत्र्याचा उल्लेख

    “महाराष्ट्र सरकारमधील एका मंत्र्याने म्हटलं की, माझ्याकडे महिला अधिकारी पाठवायचे नाहीत आणि ते महिलांच्या सन्माची गोष्ट करतात. महिलांच्या सुरक्षेची गोष्ट करा”, असं अरविंद सावंत यांनी सुनावलं.

    अरविंद सावंत यांनी भाजपच्या ‘त्या’ नेत्यांची नावे घेतली

    “सर, कुलदीप सेंगर कोणत्या पक्षाचे आहेत ते विसरु नका. बृजभूषण सिंह महिला सन्मान करणारे आहेत का?”, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला. यानंतर भाजपच्या खासदारांमधील खासदार निशिकांत दुबे विरोध करु लागले. त्यावर अरविंद सावंत यांनी सवाल केले. “तुम्हाला बलात्कारी जास्त प्रिय आहेत का? त्याचे नाव येऊ द्या रेकॉर्डवर”, असं अरविंद सावंत म्हणाले.

    निशिकांत दुबेंचा आक्षेप

    निशिकांत दुबे यांनी संबंधित नेत्यांची नावे रेकॉर्डमधून काढण्याची मागणी केली. त्यावर लोकसभेचे तालिका अध्यक्ष जगदम्बिका पाल यांनी त्यांची मागणी मान्य केली. असा कुणावर आरोप केला जाऊ शकत नाही, असं ते म्हणाले. त्यावर अरविंद सावंत यांनी आक्षेप घेत संबंधित नावे रेकॉर्डमध्ये घ्यावेत, अशी मागणी केली. यानंतर निशिकांत दुबे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.

    निशिकांत दुबे यांचं आदित्य ठाकरेंबद्दल वक्तव्य

    “हे जर कुलदीप सेंगर आणि बृजभूषण सिंह यांची बात करत असतील तर आदित्य ठाकरे यांचीदेखील बात होईल. त्यांनीदेखील हिरोईनला विष देवून मारुन टाकलं”, असं धक्कादायक वक्तव्य निशिकांत दुबे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर अरविंद सावंत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.

    अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे संतापल्या

    “हे चुकीचं आहे. ह्यांना असं बोलण्याचा अधिकार नाही. ह्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. हे काय आहे?” असा सवाल करत अरविंद सावंत संतापले. तसेच “आदित्य ठाकरे यांच्याबद्दल अशाप्रकारे बोलणं योग्य नाही. ते असं बोलू शकत नाहीत”, अशा शब्दांत सुप्रिया सुळ यांनीदेखील संताप व्यक्त केला. यावेळी वातावरण प्रचंड तापलेलं होतं. लोकसभेत गोंधळ झाला. तालिका अध्यक्षांनी यावेळी निर्वाळा केला.

    अरविंद सावंत यांचा दुबेंना इशारा

    “मी गुन्हेगारांचं नाव घेतलं, जे जेलमध्ये गेले. कुणाला बदनामा करायचं असतं तर मी तडीपारचं नाव घेऊ का? की तोण तडीपार होतं? एपस्टिन फाईलचं नाव घेऊ का? मला सांगाना. माझं तोंड उघडायला लावू नका. माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत. लाईन आहे. त्यांनी माफी मागावी”, असं अरविंद सावंत यांनी सुनावलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा